Skip to main content

ज्येजू - Seogwipo city- कॅनोलाची फुले

पिवळा रंग म्हणजे तेज. पिवळा रंग म्हणजे आनंद. पिवळा रंग म्हणजे सकारात्मकता. पिवळा रंग म्हणजे सूर्यप्रकाश. पिवळा रंग म्हणजे वसंत ऋतू!

गेल्या आठवड्यात भारतात आम्ही विजयादशमी साजरी केली. दारांना झेंडूच्या माळा बांधल्या. झेंडूचा तो झळाळता पिवळा आणि केशरी रंग खूपच ऊर्जा देणारा आहे. त्या पिवळ्या रंगाने मला आठवण झाली ती एका ठिकाणाची. असे ठिकाण की जिथे नजर पोचेल तिथपर्यंत, मला असा सुंदर ऊर्जादायी पिवळा रंग दिसला होता. 

ते ठिकाण होते दक्षिण कोरियामधील ज्येजू बेट. दक्षिण कोरियाला अपार नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेले आहे आणि ज्येजू तर जणू त्या नैसर्गिक सौंदर्याचा मुकुटमणीच!

पूर्वी ज्येजू अनेक नावानी ओळखले जात असे. देवांची भूमी, कोरियाचे हवाई अशी अनेक नावे. त्यातील सर्वात योग्य नाव होते समदादो. समदादो म्हणजे तीन गोष्टी विपुल प्रमाणात असणारे बेट. कोणत्या होत्या त्या तीन गोष्टी? तर खडक, वारा आणि स्त्रिया. 
 
ज्वालामुखीच्या मुळे बनलेले बेट असल्याने सर्वत्र बसाल्ट खडक दिसतो. समुद्रात असलेले स्वतंत्र बेट आहे, त्यामुळे चहुबाजूनी वारा वर्षभर घोंघावत असतो. त्यामुळे ज्येजू ला कधी कधी वादळी रस्त्यावरचे वळण किंवा कोपरा असेही म्हटले जाते. कधी काळी ज्येजू ला मातृसत्ताक पद्धतीशी साधर्म्य असलेली कुटुंब पद्धती देखील होती. स्त्रियांनी ज्येजूची खडकाळ जमीन सुपीक बनवण्यासाठी शतकानुशतके अपार मेहनत केलेली आहे. शिवाय ज्येजू च्या हेनयो पाणबुड्या महिला तर जगप्रसिद्ध आहेत. कोणत्याही संरक्षक उपकरणांच्या शिवाय, खोल पाण्यात बुडी मारून अबलोन्स आणि इतर सागरी जीव संपत्ती कमावून आणणाऱ्या ह्या निधड्या महिला जगात एकमेव. 

मी तुम्हाला म्हणाले की झेंडूच्या उत्सवी पिवळ्या केशरी रंगामुळे मला ज्येजूची आठवण झाली. ज्येजूवरील पिवळा रंग आहे कॅनोला फुलांचा आणि केशरी रंग आहे संत्र्यांचा. 

गन्ग्यूल जातीची ही संत्री सगळीकडे तुम्हाला दिसतील. साधारण पणे मँडरिन ऑरेंजेस किंवा टॅन्ग्रीन्स सारखी असणारी ही छोटी छोटी संत्री. बागांतून तर असतातच पण अगदी रस्त्याच्या कडेला देखील, झुडुपांच्या रांगाच्या रांगा ह्या संत्र्यांनी लगडलेल्या दिसतात. काही संत्री तर जमिनीवर गळून पडलेली देखील असतात. पण कोणी ती उचलत नाहीत. ती शहराच्या नगरपालिकेच्या मालकीची असतात. हे पाहिल्यावर ज्येजूचे अजून एक नाव किती चपखल आहे त्याची जाणीव होते. अजून एक नाव होते सम्मोदो. त्याचा अर्थ तीन गोष्टी नसलेले बेट. कोणत्या होत्या त्या तीन गोष्टी? तर चोर, भिकारी आणि घरांची फाटके! चोर आणि भिकारी नसल्यामुळे घरांना फाटके लावायची गरज नव्हतीच. 

ज्येजूची अर्थव्यवस्था खरेतर उद्योगधंदे, शेती आणि मासेमारीवर अवलंबून होती. पण आता पर्यटन व्यवसायाने ह्या साऱ्यांना मागे टाकले आहे. दक्षिण कोरियातीलच नव्हे तर जगभरातील सगळ्यांनाच जिथे जायचे असते असे हे ठिकाण. अनेक गोष्टींसाठी ज्येजू प्रसिद्ध आणि प्रेक्षणीय आहे. दरवर्षी हजारो लाखो कोरियन आणि चिनी प्रवासी ज्येजूला भेट देतात. 

पर्यटनावर आधारलेली अर्थव्यवस्था असेल तरीही चिनी प्रवाशांची वाढती संख्या खरे तर स्थानिक लोकांना फारशी आवडत नाही. त्यांचे म्हणणे आहे की जरी चिनी लोक ज्येजूमध्ये येऊन पैसे खर्च करतात तरी ते पैसे नेहमी चिनी माणसाच्या हॉटेलमध्येच खर्च करतात. त्याचा स्थानिकांना काही उपयोग नाही. चिनी लोक जमिनीचे, जागेचे मालक असण्याचे प्रमाण गेल्या काही दशकात अनेक पटींनी वाढले आहे. 

पण मग नंतर आली चीन सरकारने साऊथ कोरियाला जाणारी तिकिटे विकू नयेत अशी चिनी पर्यटन कंपन्यांना केलेली सूचना. ह्याचे कारण होते दक्षिण कोरियाने उभारलेली Thadd- terminal high altitude area defense system. चीन सरकारला हे आवडले नव्हते. खरेतर चिनी लोक इतक्या जास्त प्रमाणात यायचे की ते यायचे बंद झाल्यावर पर्यटन व्यवसाय धोक्यातच आला असता. पण आता चिनी लोक येत नाहीत म्हटल्यावर, सगळीकडे त्यांचा गोंधळ नसेल असे जाणवल्यावर, दक्षिण कोरियाच्या मुख्य प्रदेशातील लोक जास्त प्रमाणात यायला लागले. ज्येजू ला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली. 

 


दिवसाची सुरुवात
थोडा ढगाळ दिवस!

तर आता परत वळू या आपल्या कॅनोलाच्या फुलांकडे! कॅनोला काय आहे? रॅपसीड नावाच्या तेलबियांपासून एक सुधारित वाण तयार केला गेला. हा वाण शोधला आणि तयार केला होता कॅनडा ने. त्यामुळे कॅन म्हणजे कॅनडा आणि ओला म्हणजे तेल. रॅपसीड पेक्षा कॅनोला अधिक चांगले कारण त्यात आम्ल कमी प्रमाणात असते. ह्या तेलात अँटीबॅक्टरीअल आणि इतरही औषधी गुणधर्म आहेत. मोहरीच्या जातीतील ह्या बिया आहेत. कॅनोला ला कोरियन भाषेत यूचे म्हणतात. पण त्याचे नाव घेताना म्हणतात यूक्कोत! म्हणजे यूचे चे फुल असे म्हणतात.

वसंत ऋतूचे आगमन ज्येजू बेटावर साधारणपणे मार्चच्या मध्यात होते. ज्येजूची खासियत अशी की तुम्ही चेरी ब्लॉसम (कोरियन भाषेत त्याला बेक्कोत म्हणतात.) आणि यूक्कोत चा बहर एका वेळी पाहू शकता! ह्याच मुळे ज्येजू हे वसंत ऋतूचा आनंद घेण्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण आहे. 
 


 नंतर काय दिसणार आहे ह्याची एक झलक
रस्त्याच्या बाजूला पडलेल्या चेरी ब्लॉसम आणि कॅनोलाच्या पाकळ्या.
 
चेरीब्लॉसम चा सरता बहर 
 
चेरी ब्लॉसम - बेक्कोत 


कॅनोला ची फुले


युक्कोतचा गुच्छ 

 Seogwipo शहर ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे ते सगळे!
घोडे, चेरी ब्लॉसम आणि कॅनोला ची फुले 


युक्कोत आणि बेक्कोत 

ह्या विस्तीर्ण पटावर बेक्कोतचा फिका गुलाबी आणि युक्कोत चा झगमगता पिवळा रंग अतिशय खुलून दिसतात. बेक्कोत ची झाडे उंच असतात तर यूक्कोत फुले झुडुपांवर येतात. लाल जमीन, पिवळे यूक्कोत, गुलाबी बेक्कोत, काळे बसाल्ट चे डोंगर आणि गडद निळे आकाश. रंगांचा आणि आकारांचा अतिशय मनोवेधक पट आपल्यासमोर उलगडत जातो! 

हे दोन्हीही म्हणजे चेरी ब्लॉसम आणि कॅनोला अल्पकाळासाठीच फुलतात. त्यामुळे तुम्हाला तुमची ट्रिप त्यांच्या फुलण्याच्या वेळा बघून त्याप्रमाणे ठरवायला लागते. आम्ही ज्येजूला एप्रिल २०१९ मध्ये भेट दिली होती आणि आमचे नशीब चांगले की आम्हांला बेक्कोतचा सरता बहर आणि यूक्कोतचा ऐन बहर बघता आला होता. 

ज्येजूच्या Seogwipo शहरात १९६० पासून कॅनोलाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. जेव्हा ही फुले बघायला येणारे पर्यटक म्हणजे अर्थव्यवस्थेला भरती हे गणित स्थानिक ग्रामपरिषदांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी आणखी मोठ्या प्रमाणात कॅनोलाची लागवड करायला सुरुवात केली. 

Gasi Ri नावाचे गाव कॅनोलाच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. सर्वात जास्त फुले बघायला मिळतात असे ते ठिकाण आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये तिथे ज्येजू कॅनोला पुष्प महोत्सव भरवला जातो. विविध कार्यक्रम होतात. सांस्कृतिक कार्यक्रम, शोभायात्रा, फोटो काढण्यासाठी तयार केलेली ठिकाणे, खाद्यपदार्थ स्पर्धा, कार्यशाळा आणि विक्री, गोंडस बालक स्पर्धा, भेटवस्तू, स्मृतिचिन्हे आणि कितीतरी कार्यक्रम असतात. तीन दिवसांसाठी हा महोत्सव चालतो. ह्या फुलांच्या बहराच्या काळात साधारणपणे १६०,००० लोक ज्येजूला भेट देतात.

 ह्या गावात १० किलोमीटर लांबीचा एक रस्ता आहे, त्याचे नाव Noksan-ro. हा रस्ता दक्षिण कोरियातील सर्वात सुंदर रस्त्यांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. का बरे? कारण त्याच्या दोन्ही बाजूला चेरी ब्लॉसम आणि कॅनोला फुले फुललेली असतात! दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर दुतर्फा हे पुष्पवैभव आपल्या डोळ्यांना, मनाला सुखावत असते. जेव्हा तो रस्ता समोर येतो तेव्हा त्यांच्या प्रथम दर्शनानेच आपण अवाक होऊन जातो. नक्कीच तो जगातील सर्वात नयनरम्य रस्त्यांपैकी एक आहे.

 
Noksan Ri 



 Noksan -ro वरून प्रवास करताना अर्थातच तुम्ही अनेकदा गाडी थांबवून खाली उतरता. फोटो घेण्यासाठी! तुम्ही स्वतःला थांबवूच शकत नाही. त्या सुंदर दृश्याने तुमचे भान हरपलेले असते. पण विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या वाहनांकडे मात्र लक्ष राहू द्या!

 Noksan Ri - एक सुंदर रस्ता!

हा प्रवास झाल्यावर किंवा खरे तर ह्या सुंदर प्रवासातच तुम्ही पोचता Gas ri पवन ऊर्जा निर्मिती केंद्राच्या जवळच्या शेतांमध्ये. आमची गाडी जेव्हा मुख्य रस्त्यावरून डावीकडे वळली तेव्हा समोर एक अतिशय रुक्ष भिंत आली. एखाद्या गोदामाची असावी तितकीच अनाकर्षक. मला कळलेच नाही की इतक्या सुंदर रस्त्यावरून इतक्या रुक्ष ठिकाणी ड्रॉयव्हर आम्हाला का घेऊन आला असेल? त्याने नुसते सांगितले की आत जा. त्याच्या सूचनेप्रमाणे आम्ही आत गेलो आणि आमच्या समोर होते आयुष्यात क्वचितच पाहायला मिळते इतके सुंदर दृश्य! 

जिथपर्यंत नजर पोचेल तिथपर्यंत ही छोटुकली, नाजूक, झळाळत्या पिवळ्या रंगाची सुंदर फुले वाऱ्यावर डोलत होती. मी आयुष्यात कधीही हे दृश्य विसरणार नाही. जादुई दृश्य, दैवी दृश्य. शांतता देणारे दृश्य. जरी मुख्य रस्ता जवळच होता, तरी वाहनांचा आवाज शांती भंग करण्यासाठी कानांपर्यंत येत नव्हता. त्या पवन चक्क्या आणि डोंगर आजोबा ह्या शेतात खेळणाऱ्या कॅनोला बाळांवर लक्ष ठेवून होते. आकाश साक्षीभावाने माझ्या उचंबळून आलेल्या भावनांकडे पाहत होते. एकदम पारलौकिक, अद्भुत अनुभव होता तो. 


















फुलांच्या महासागरात हरवताना
चकित करणारा परमानंद अनुभवताना 
हरवून जाते भान स्थळकाळाचे 
वाटते अनंतकाळापासून आहोत असेच, इथेच.
निसर्गाबरोबर एकात्मभावाचा प्रत्यय येतानाच 
ते गारुड कब्जा घेते तुमचा, 
आता तुम्हाला आनंद नुसता वाटत नसतो..
तर तुम्हीच आनंदस्वरुप बनलेले असता!! 

तिथे कुंपणे नाहीत. तुम्ही फुलांच्या जवळ जाऊ शकता, फुलांच्या रांगांतून चालू शकता. फुलांची काळजी घेण्याची जबाबदारी तुमच्यावरच टाकलेली असते. तिथे कोणी रखवालदार नसतात. पण प्रत्येकाला हे माहिती असते, की तुमच्याकडे कोणी बघत नसताना देखील, तुम्ही कसे वागता ह्यावरून तुमची संस्कृती आणि संस्कार दिसतात! अर्थात काही नग तिथेही असतातच, की जे फुले तोडतात किंवा फोटो काढण्याच्या गडबडीत, खरे तर नशेत, फुले पायदळी तुडवतात. मात्र त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. बाकी सगळे अगदी जपूनच चालतात. 

आम्ही ज्येजू ला एप्रिल २०१९ मध्ये गेलो होतो. मला उत्सुकता होती २०२० च्या ज्येजू कॅनोला पुष्प महोत्सवाचे काय होणार ह्याची. दक्षिण कोरियाने कोरोनाचा अतिशय यशस्वी सामना केला होता. मार्च मध्येच त्यांच्याकडची रुग्णसंख्या खूप कमी झाली होती. 

मी बातम्यांवर लक्ष ठेवले होते. पण जे वाचायला मिळाले ते अतिशय धक्कादायक होते. फुले तर निसर्गनियमानुसार वेळच्या वेळीच फुलली होती. स्थानिक प्रशासन, लोकांना ज्येजूला भेट न देण्याचे, सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन करीत होते. हॉटेल्स आणि विमानकंपन्या मात्र ज्येजूला लोकांनी भेट द्यावी म्हणून, खास सवलती जाहीर करत होत्या. बाकी अनेक देशांनी विमान वाहतूक बंद केल्याने जे कोरियन लोक दुसरीकडे फिरायला जाऊ शकत नव्हते त्या सगळ्यांनी ह्या सवलतींचा लाभ घ्यायला सुरुवात केली. 

अशा बाहेरून येणाऱ्या प्रवाश्यांमुळे, स्थानिक लोकांना कोरोना संसर्ग होण्याच्या घटना आढळू लागल्या तशी स्थानिक जनतेला आणि प्रशासनाला चिंता वाटू लागली. Seogwipo नगर परिषदेला नाईलाजाने एक दुःखद आणि क्रूर निर्णय घ्यावा लागला. 

त्यांनी चक्क चार ट्रॅक्टर आणले आणि सगळ्या शेतातून फिरवून सर्व फुले तोडून टाकली. हेक्टर च्या हेक्टर जिथे फुललेले रान होते ते आता उजाड माळरान होऊन गेले. त्या गावात अनेक वयोवृद्ध लोक राहत असल्याने, त्यांना संसर्ग होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला. येणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला असे नगर परिषदेने जाहीर केले. 

तुम्ही इंटरनेट वर शोधलेत तर अजूनही ह्या बातम्या आणि फोटोज पाहू शकता. 
https://www.dailymotion.com/video/x7t6qhk ह्या लिंकवर विडिओ देखील पाहू शकता.
 
मी जेव्हा बातम्या वाचल्या, हा विडिओ पाहिला तेव्हा अतिशय दुःख झाले. माणसे त्यांची पैश्यांची हाव, त्यांच्या ईच्छा आणि लहरी ह्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत ह्याची शिक्षा फुलांना का? त्यांचा काय दोष? माणसांना वळण लावणे अवघड आहे, फुलांना जमीनदोस्त करणे सोपे आहे.
 
जास्त प्रमाणात पर्यटक यावेत, पैसे मिळावेत म्हणून मोठ्या प्रमाणात फुलांची शेती केली गेली. येणाऱ्या लोकांपासून, प्राणांचे भय निर्माण झाले तेव्हा त्यांना येण्यापासून रोखण्यासाठी ती उपटून टाकली गेली. एक वर्तुळ पूर्ण झाले. 

#PlacesToSeeInSouthKorea #CanolaFestivalInJeju #HaenyeoInJeju #HaenyeoWomenBraveWomen #CherryBlossomInJeju #YellowFlowersInJeju


 

 

 


Comments

Popular posts from this blog

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...