Skip to main content

टेराकोटा सेना - एक मोठे रहस्य 

मला वाटते तुम्ही आधी बाँपो म्युझियम बघून मनाची तयारी करावी, नंतर टेराकोटा योध्दे प्रतिकृती बनताना पाहून, मग आपल्याला काय पाहायचे आहे त्या विषयीच्या कल्पना कराव्यात आणि मग टेराकोटा योध्दे सापडले ते ठिकाण पाहायला जावे. सरळ टेराकोटा योध्देच बघायला जाणे थोडे धक्कादायक होऊ शकते.

टेराकोटा सेना 

आधुनिक काळातील उत्खननात टेराकोटा सेनेचे उत्खनन हे खूपच, जवळपास सर्वात महत्वाचे उत्खनन आहे. काय आहे ही टेराकोटा सेना आणि ती कशी सापडली? आपण ते नंतर बघू या. आधी मी म्हटले तसे बाँपो संग्रहालय बघायला जाऊ या. 


बाँपो म्युझियम 


चीन मधील शान्क्सि भागात बाँपो म्युझियम आहे. शियान शहराजवळच्या एका प्रागैतिहासिक उत्खनन स्थळाजवळ हे म्युझियम उभारलेले आहे. ६००० वर्षांपूर्वीच्या खेड्यातील जीवन कसे असेल ह्याची झलक आपल्याला इथे पाहायला मिळते. प्रदर्शन कक्षात उत्खननात सापडलेल्या अनेक कलाकृती पाहायला मिळतात. 

बाँपो येथे सापडलेली चित्राकृती


बाँपो येथे सापडलेली ही एक चित्राकृती. ह्या चित्रात मासे, माणूस आणि डोंगर दाखवला आहे. चित्रलिपीतील काही अक्षरे दगडावर किंवा एखाद्या खापरावर कोरलेली अशी देखील ह्या उत्खननात सापडली आहेत. 

बाँपो ला आपण एक व्यवस्थित आराखड्यानुसार आखलेली, सगळीकडून खंदकाने सुरक्षित केलेली अशी वसाहत, म्हणजे तिचे अवशेष पाहू शकतो. ह्या वसाहतीचा कालावधी आहे, ५००० B.C. ते ३००० B.C. म्हणजे जवळपास सहा ते सात हजार वर्षांपूर्वीच्या ह्या वसाहती आहेत. 

काही घरांचा पाया, जोती आपण ह्या उत्खनन स्थळी पाहू शकतो. 


सहा हजार वर्षांपूर्वीचा घराचा पाया 

त्या वेळी घरांच्या भिंती लाकडाच्या भुश्यापासून केलेल्या असाव्यात व वाळलेल्या गवताने शाकारलेली छपरे असावीत असा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. तिथे सापडलेल्या आराखड्यानुसार बांधलेली काही घरे प्रदर्शनीत आपण पाहू शकतो.

मूळ आराखड्यानुसार बांधलेली घराची प्रतिकृती


असे वाटते की त्या गावाचे तीन भाग असावेत. एक होता राहण्यासाठी घरे असलेला भाग. दुसरा होता कुंभारकाम चालायचे, त्यासाठी अवजारे आणि भट्ट्या असलेला भाग. इथे सापडलेली काही अवजारे आणि भट्ट्यांचे भाग प्रदर्शनीत मांडलेले आहेत. तिसरा होता दफन विधी साठी नियुक्त केलेला भाग. लहान मुलांना पुरण्यासाठी वापरले जाणारे रांजण आणि मोठ्या माणसांची थडगी उत्खननात सापडली आहेत. म्हणून मग गावातील ह्या भागाला दफनभूमी असे म्हटले जाते.


गावातली दफनभूमी

अभ्यासकांना असे पुरावे सापडले आहेत की बाँपो ही नवपाषाण युगातील मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात असलेली वसाहत होती. Yangshao संस्कृती ( 5000-3000 B.C.) इथे असावी असा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. 
एक लक्ष वेधून घेणारी चिनी म्हण असलेली पाटी तिथे प्रदर्शनात लावलेली होती. 

प्रदर्शनातली चिनी म्हण 


इथे जवळच आपल्याला टेराकोटा सेनेच्या प्रतिकृती कशा तयार केल्या जातात ते पाहता येते. हे बघा, इथे अगदी मन लावून काम चालू आहे.
 

प्रतिकृती तयार होत आहेत. 


ह्या संग्रहालयाच्या आवारात आला आहात आणि असा फोटो काढला नाहीत तर चालतच नाही!! म्हणजे..शास्त्रच असते ते! तुम्ही ५००० वर्षे जुने आहेत असे क्षणभर वाटून गेल्यावर, त्यानंतर बाहेर आल्यावरचा सगळा काळ एकदम तरुणच की!! 

मी ५०००वर्षांची आहे???

हं.. आता बाँपो संग्रहालय, टेराकोटा सेनेच्या प्रतिकृती बघून झाल्यावर आता तुमच्या मनाची थोडी तरी तयारी झाली आहे, प्रत्यक्ष टेराकोटा सेना बघण्याची. बाँपो पासून साधारण ३० किलोमीटर प्रवास केलात की तुम्ही पोचता टेराकोटा सेनेच्या संग्रहालयाला. 

काय आहे ही टेराकोटा सेना? तर मातीचे पूर्णाकृती पुतळे आहेत. कोणाचे? तर सैनिक, घोडे आणि अधिकाऱ्यांचे. 

१९७४ मध्ये काही शेतकरी आपल्या शेतात विहीर खणत होते, तेव्हा त्यांना एक मातीचे मस्तक सापडले. मग पुरातत्व विभागाने त्या भागात उत्खनन केल्यावर ही सगळी सेना सापडली. हे पुतळे किती जुने आहेत? तर फक्त २००० वर्षे जुने आहेत. 

२२१ B.C.मध्ये राज्यावर आलेला चिनी सम्राट Qin Shi Huangdi ह्याच्या थडग्याजवळ काही किलोमीटर अंतरावर ही सगळी सेना सापडली आहे. त्या सम्राटाच्या थडग्याचे मात्र अजून उत्खनन करण्यात आलेले नाही. असे का? तर तिथे राजाच्या सोबतच विविध कलाकृती, मौल्यवान रत्ने आणि दागिने अशा गोष्टी पुरलेल्या आहेत. थडगे उघडले तर हवेच्या संयोगाने ते खराब होतील. म्हणून नवे तंत्रज्ञान सापडेपर्यंत ते थडगे तसेच ठेवण्याचा निर्णय चीन सरकारने घेतलेला आहे. 

असे म्हणतात की त्या थडग्यात पाऱ्याच्या नद्या आणि समुद्र करण्यात आले होते. थडगे उघडताच तेही विषारी ठरू शकेल. 

त्या थडग्यात स्वसंरक्षक रचना देखील केलेली आहे. म्हणजे जसे की दार उघडले जाताच आपोआप बाण लागेल असे. ते देखील प्राणघातक ठरू शकेल. ह्या सर्व कारणांमुळे खुद्द सम्राटाच्या थडग्याचे अजून उत्खनन केले गेले नाही. 

जरी प्रत्यक्ष थडग्याला स्पर्श केला गेला नसला तरी त्याच्या आजुबाजू च्या  परिसराचे उत्खनन झाले आहे. त्यात असे आढळले की राजासोबत त्याच्या अनेक तरुण उपपत्नी, रखेल्या पुरल्या गेल्या होत्या. 

सम्राटाच्या मृत्यूनंतर त्याचा मोठा मुलगा सिंहासनाचा वारस होता. पण त्याच्या दुसऱ्या मुलाला सत्ता हवी होती. त्यासाठी त्याने आपल्या सर्व सख्ख्या व सावत्र भावांना मारून टाकले. एवढेच काय सिंहासनाला आपल्याखेरीज इतर कोणीच वारसदार राहू नये म्हणून वडिलांच्या सर्व रखेल्याना देखील मारून टाकले. न जाणो, त्यातील एखादी सम्राटाच्या मृत्यूच्या वेळी गरोदर असेल, तो वारस कुठेतरी गुप्तपणे वाढवला जाईल आणि नंतर सिंहासनावर हक्क सांगायला येईल म्हणून. त्या सर्वांचे मृतदेह त्याच परिसरात पुरले गेले आहेत. 

इतक्या अघोरी रक्तरंजित मार्गाने सत्ता मिळवलेल्या त्या राजपुत्राला केवळ तीन वर्षे राज्य करता आले. 

जो सम्राट होता, Qin Shi Huangdi त्याला मृत्यूनंतर काय ह्याची खूप उत्सुकता होती. माणसाला अमर करणाऱ्या औषधीच्या शोधात त्याने अनेक प्रवास केले होते, अनेक वर्षे तो शोध घेत होता. मृत्यूनंतरच्या आयुष्यातही आपल्या सोबत असावी म्हणून त्याने ही सगळी टेराकोटा सेना उभारली असे म्हणतात. 

गेल्या जवळपास पन्नास वर्षात, अगदी नेमके सांगायचे तर ४६ वर्षात पुरातत्व खात्याला ६०० तळघरे सापडली आहेत. त्यातील काही तळघरे अजून उघडता आलेली नाहीत. काही तळघरात मात्र प्रवेश करता आला आहे. 

त्यातील दोन तळघरे अशी होती की त्यात काहीतरी संपूर्णपणे जाळून टाकले गेले होते. काय होते त्यात? कोणाला जाळले गेले? का जाळले गेले? कोणालाच माहिती नाही. 

बाकी तळघरातून सैनिकांच्या तुकड्या युद्ध करण्यासाठी तयार असलेल्या अवस्थेत उभ्या दिसतात. कोणाशी युद्ध? मृत्यूशी तर नव्हे? कोणालाच माहिती नाही. 

सेना संरक्षण करण्यासाठी नेमली गेली आहे का? कोणाचे आणि कशापासून संरक्षण? कोणालाच माहिती नाही.

हे सगळे सैनिक आपापल्या हुद्द्याप्रमाणे उभे आहेत. सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहे. पायदळ, घोडेस्वार, शस्त्रधारी घोडेस्वार एका व्यूहरचनेत उभे आहेत. त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र जागा आहे. बाजूच्या तळघरातून गायक, वादक, कसरतपटू, दरबारी अधिकारी, चित्रविचित्र प्राणी ह्यांचे पुतळे सापडले आहेत. 


टेराकोटा सेना


 

घोडदळ 


पायदळ 

तळघरे 

युद्धासाठी सज्ज

स्वारांची वाट पाहणारे घोडे 

पुतळ्यांची दुरुस्ती, देखरेख 


दर्शिका 

उच्चपदस्थ अधिकारी 

उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे वर्णन 

विविध पदांवरील सैनिक आणि अधिकारी आपापल्या पदानुसार गणवेश घातलेले आणि शस्त्रे धारण केलेले दाखवले आहेत. 

धनुर्धारी 

धनुर्धाऱ्याचे वर्णन 

उत्खननात हजारो सैनिकांचे पुतळे सापडले. आत्तापर्यंत ८००० हुन अधिक सैनिक, शंभराहून अधिक रथ, पाचशे हुन अधिक घोडे असे पुतळे सापडले आहेत. अजूनही सापडत आहेत. नुकतेच तिथे २०० पुतळे सापडले अशी बातमी आहे. ते कोणाचे पुतळे आहेत ते मात्र अजून चीन ने जगाला सांगितलेलले नाही. प्रत्यक्षात एकूण किती योध्दे होते ते कदाचित कोणालाच, कधीच कळणार नाही. 

तिथे सापडलेले दोन हजार वर्षांपूर्वीचे दोन कास्य रथ हे तर एक अद्भुत नमुना आहेत. प्रदर्शनीत पाहायला मिळतात. 

ह्यातला प्रत्येक सैनिक वेगळा दिसतो. त्याची चेहरेपट्टी, चेहऱ्यावरचे भाव, अंगकाठी सर्व वेगवेगळे. एकही सैनिक दुसऱ्यासारखा नाही. किती कौशल्य त्या शिल्पकारांचे!!! मुळात त्यांचे कपडे रंगीत होते. पण उत्खनन झाल्यावर हवेचा स्पर्श झाल्याने ते रंग उडून गेले आहेत. आता सर्व जण राखाडी रंगा च्या कपड्यात दिसतात. कुठे कुठे मात्र थोडा थोडा रंग अजूनही शिल्लक आहे. 

हे सगळे पुतळे हाताने बनवलेले आहेत. त्यांची उंची आत्ताच्या सर्वसाधारण चिनी माणसापेक्षा खूप जास्त आहे. असे का? हे देखील नवलच आहे. कारण दोन हजार वर्षांपूर्वी देखील चिनी माणूस ह्या पुतळ्यांइतका उंच नव्हता. 

तिथे सापडणाऱ्या स्थानिक पिवळ्या मातीपासून हे पुतळे तयार केले गेलेले आहेत आणि नंतर भट्टीत भाजले गेले आहेत. आसपासच्या परिसरात भट्ट्यांचे अनेक अवशेष सापडले आहेत ते स्वाभाविकच आहे. 



गुडघ्यावर बसलेला धनुर्धारी 

गुडघे टेकलेला धनुर्धारी हा अगदी वैशिष्ट्यपूर्ण पुतळा आहे. त्याने डावा पाय दुमडला आहे आणि उजवा पाय जमिनीवर टेकलेला आहे. 

त्यांची अनेक शस्त्रे. काही शस्त्रांची धातूची टोके, २००० वर्षानंतर अजूनही अगदी चांगल्या स्थितीत आहेत हे एक आश्चर्यच आहे. काहींना तर अजिबात गंजदेखील लागलेला नाही. 

ह्या भव्य कबरीचा परिसर, त्यातील तळघरे आणि पुतळे तयार करण्यासाठी ७,००,००० कामगार जवळपास तीस ते चाळीस वर्षे काम करीत होते. त्यातले काही कैदी, वेठबिगार देखील होते. त्यांच्या हातातल्या बेड्या, गळ्यातले साखळदंड सापडले आहेत. कुठे सापडले? त्याचा उल्लेख नंतर येईलच.

सम्राट Qin Shi Huang मृत्यूनंतरच्या जीवनाच्या कल्पनेने भारून गेला होता, पछाडला गेला होता. राज्यावर आल्या आल्या लगेचच त्याने ह्या कबरींचे काम सुरु करवले होते. 

आपल्या कार्यकाळात त्याने, सतत आपसात लढाई करणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांना एकत्र आणले. लिपी विकसित केली. नाणी प्रमाणित केली. वजनमापे प्रमाणित केली. वेगवेगळ्या राज्यातले कालवे आणि रस्ते एकमेकांना जोडले. संरक्षणासाठी पहिली भिंत बांधण्याची सुरुवात त्यानेच केली. त्याच भिंतीच्या पुढच्या आवृत्यांना चीनची प्रसिद्ध भिंत म्हणून ओळखले गेले. एकूणच त्याची कारकीर्द अतिशय प्रभावशाली ठरली. 

सर्वात मोठे उत्खनन,आधुनिक काळातला सर्वात मोठा शोध असल्याने टेराकोटा सेना संग्रहालयाला जगभरातुन हजारो लोक भेट देतात. हे संग्रहालय उत्खननाच्या ठिकाणीच उभारण्यात आले आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष उत्खननाची जागा बघता येते. बाँपो आणि टेराकोटा सेनेच्या शोधामुळे वाढलेल्या पर्यटकांचा खूपच फायदा चीन सरकारला होतो आहे.

पण ज्या शेतकऱ्यांना विहीर खणताना हे सगळे सापडले त्यांचे काय झाले? त्यांची शेते आणि घरे सरकारने ह्या संग्रहालयासाठी, त्याच्या आजूबाजूला असलेल्या दुकानांसाठी घेऊन टाकली. त्यांना अतिशय नाममात्र मोबदला मिळाला. 

एकाने विपन्नावस्थेला कंटाळून, त्याला काही आजार झाला होता तर औषधासाठीही पैसे न उरल्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. अजून दोन जण काही विचित्र आजाराने ग्रासून मरण पावले. ह्यामुळे अनेक दंतकथा प्रचलित झाल्या. ते कबरस्थान उघडले गेल्याचा शाप शेतकऱ्यांना भोवला अशी चर्चा झाली. म्हणजे श्रीमंत झाले सरकार आणि शाप भोवला गरीब शेतकऱ्यांना. 

ह्यातले काही शेतकरी तुम्हाला पुस्तकांच्या दुकानाबाहेर बसलेले दिसतात. टेराकोटा सेनेविषयीचे एखादे पुस्तक आपण घेतले तर ते त्यावर सही करून देतात. त्याचे त्यांना अगदी थोडे पैसे मिळतात. पण हे शेतकरी खरेच ते शेतकरी आहेत, ज्यांच्या शेतात टेराकोटा सेना सापडली तेच आहेत की कोणी तोतया आहेत, हे मात्र कोणीच सांगू शकत नाही!! 

अजून कित्येक अवशेषांचे उत्खनन होणे बाकी आहे. बराच खजिना अजून जमिनीत दडलेला आहे. किती? ते माहिती नाही. 

स्थानिक लोककथा असेही सांगते की खरेतर ही सगळी खरीखुरी जिवंत सेना होती. एका शापाने ती संपूर्ण सेना मातीची झाली!!

विचार केल्यावर असे वाटते, की सम्राटाने त्याच्या राज्याची प्रतिकृतीच त्या कबर परिसरात उभारायचा प्रयत्न केला होता, मृत्यूनंतरही त्याचा उपभोग घेता यावा म्हणून. 

असे म्हणतात की तिथे काम करणाऱ्या सर्व कामगारांना म्हणजे ७,००,००० लोकांना नंतर मारून टाकण्यात आले. ह्या ठिकाणाचा पत्ता कोणालाही कळू नये म्हणून असे केले गेले असे म्हणतात. २००० वर्षे खरेच त्या ठिकाणाचा मागमूसदेखील जगाला लागला नव्हता. 

मगाशी मी म्हटले की त्यांच्या हातातील बेड्या, गळ्यातील साखळ्या सापडल्या आहेत त्या इथेच..जिथे सात लाख लोक पुरले गेले. 

मला तर सात लाख ह्या आकड्यात थोडी गडबड वाटते. कारण दोन हजार वर्षांपूर्वी जगाची लोकसंख्या किती कमी असेल? त्या काळी सात लाख मजूर आणणे किती अवघड आहे. पण अधिकृत रित्या हाच आकडा सांगितला जातो.

ह्या सर्व चमत्कारिक गोष्टींमुळे, रहस्यामुळे, इतक्या मोठ्या संख्येने पुतळे एकत्र सापडल्यामुळे, ते तयार करतानाच्या कला कौशल्यामुळे, धातुशास्त्राच्या प्रगतीमुळे चीनच्या शान्क्सि भागातील शियान जवळील हे टेराकोटा सेना स्थळ आज जगातील एक महत्वाचे आश्चर्य मानले जाते. मग युनेस्कोने १९८७ मध्ये ह्या ठिकाणाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले त्यात काय नवल!

#LifeAfterDeath #ClayArmy #ChineseEmperorTomb #UnExcavatedTomb #TeracottaWarriors #BanpoCulture #MatriarchalClan #GreatestExcavationOn Earth
 

.


Comments

Popular posts from this blog

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

Prashanti Kutiram, Bangalore

I am happy to write my first post of 2022!! I am here with a really very special post! This is not a tourist place and still it holds a special place in each and every visitor’s mind. This is Prashanti Kutiram of Bangalore. Prashanti kutiram as the name suggests, surely makes your mind peaceful. It's around 70-80 kms from Bangalore airport but with the famous traffic jams of Bangalore, it may take two and half hours by taxi.  This is the place where The Swami Vivekananda Yoga Anusandhan Sansthan is situated on a sprawling 100 acres. Swami Vivekanand  Swami Vivekanand  Ramakrishna Paramahans and Sharada Mataji  SVyasa Founded in 1986, Svyasa follows Swami Vivekanand's teachings and combines best of east and West. So it combines Yoga and spirituality with modern sciences.  The first thing you will notice about Vyasa is the greenery. The campus is having umpteen trees. It's hilly area. The steep paths and slopes offer you the much needed exercise!! The Green Umbre...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...