Skip to main content

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 2 - सारी - देवरियाताल

दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेकला सुरुवात झाली तीच एका तीव्र चढणीने!! चढताना एका क्षणी मागे वळून आम्ही सारी बेस कॅम्पचा निरोप घेतला. परत येउ तेव्हा ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला असेल की नाही, ते माहिती नव्हते. पण अनुभवसमृद्ध मात्र नक्की होऊन परत येऊ ह्याची ग्वाही मनातच दिली.
सारी बेस कॅम्प
📷 Supan Shah
रस्ता ओबडधोबड दगडांनी तयार केलेला होता. पण भुसभुशीत मातीत पाय घसरण्यापेक्षा दगड परवडले असे मनाला सांगत चढण चढत होते.
📷 Pawan Gowda

ह्या फोटोवरून चढ किती होता त्याचा तर अंदाज येईल पण आम्ही सगळे कसे चढत होतो ते कळायचे असेल तर व्हिडिओ आहे ना!
विडिओ - सम्राट दर्डा
रस्त्याचा सुरुवातीचा काही भाग लोकवस्तीतून जाणारा. पण तेथील घरेही अगदी तुरळक आणि तशी लांब लांब. हिरवीगार शेते मात्र दिसत होती. डोंगर उतारावर पायऱ्यांसारखे बांध घालत केलेली ही शेती संपूर्ण उतार जिवंत करत होती.
The view 📷 Supan Shah
📷 Samrat Darda
तासभर तीव्र चढणीचा रस्ता पार केल्यानंतर थोडया वेळाने तुलनेने जरा सपाट भाग आला तेव्हा हृदयाने थँक्यू म्हणायला सुरूवात केली!! तिथून चंद्रशिला शिखराचे दर्शन देखील झाले.
साधारण तासा दीड तासाने आम्हाला थोडी विश्रांती मिळाली ती देखील जरा सपाट जागेवर!इथून पुन्हा एकदा थोड्या वेळासाठी सारी गाव दिसू लागले. चढणीने श्वासाचा वेग वाढलेला असला तरी इतक्या दिवसांच्या तयारी आणि वाट पाहण्यानंतर खरा ट्रेक सुरु झाल्याचा आनंद अवर्णनीय होता. वाटेत एखाद दुसरे बुरांशचे झाड फुललेले दिसले की पावलांचा वेग कमी होत होता. काहीजण फोटो काढत होते. तेव्हा ट्रेक गाईड सांगत होते की आपल्या कॅम्प जवळ भरपूर झाडे आहेत फुललेली.
रस्ता आता जंगलातून जात होता. आसपास मानवी वस्तीच्या खुणा नाहीत. झाडांतून गाळून येणारे ऊन, सतत एका बाजूने साथीला असणारा डोंगरकडा आणि आमची टीम.
काही वेळानंतर एक मोठे असे गवताळ पठार लागले. पठाराला उत्तराखंडमध्ये बुग्याल म्हणतात आणि प्रत्येक पठाराला शिवाय स्वतःचे नाव देखील असते. ह्याचे नाव होते रोपीनी बुग्याल. तिथे आम्हाला विश्रांतीसाठी थोडा वेळ मिळाला होता.
Near Ropini Bugyal
📷 Kedar Tembe
इथेच आम्हांला चौखंबा शिखरे देखील दिसली पण त्यांचा सतत लपंडाव चालू होता. क्षणार्धात दिसायची तर क्षणार्धात ढगांआड दडायची.
Chaukhamba peaks in the veil of clouds
📷 Kedar Tembe
📷 Samrat Darda
📷 Supan Shah
ढग येत जात असले तरी ऊन देखील होते. चालण्याच्या श्रमाने सगळेच घामेघूम झालो होतो. खडबडीत दगडी रस्ते, डोंगर वाटा ह्यातून काही तास चालल्यावर जंगलातला रस्ता आला. कितीतरी ऱ्होडोडेंड्रॉन्स फुलले होते. मन अगदी प्रसन्न झाले.
📷 Pawan Gowda
फोटोंसाठी रेंगाळणाऱ्या काहीजणांना आमचे ट्रेक गाईड "चलो चलो कीप मुविंग " म्हणत पुढे नेत होते. त्यांचेही बरोबर होते. कारण अजून एक अवघड चढण बाकी होती. माध्यान्हीचे ऊन तळपत होते.
📷 Sumati Dhembre
असे पाहताना चढण चढणे अवघड वाटले तरी खरी कसोटी लागते ती उतारावर!! इतका मोठा देह उतारावरून सरळ गडगडत खाली जाऊ नये म्हणून पाय जास्त रोवून टाकायला लागतात!!!
ह्या चढानंतरचा उतार उतरत असतानाच तळ्याची चाहूल लागू लागली. नितळ जलाशय दिसले की एक वेगळीच अनुभूती येते. देवरिया ताल दिसले आणि इतका वेळ चालण्याचे सगळे श्रम निमाले. फार सुंदर दृश्य होते ते.
हवा तेवढी स्वच्छ नव्हती म्हणून पर्वत शिखरांची प्रतिबिंबे मात्र पाण्यात पाहता आली नाहीत. एरवी हवा स्वच्छ असताना इथे चौखंबा शिखरे प्रत्यक्ष आणि त्यांची प्रतिबिंबे पाण्यात असे अप्रतिम दृश्य दिसते. पण जे पाहायला मिळाले तेही काही कमी सुंदर नव्हते.
📷 Sumati Dhembre
झाडीने वेढलेला जलाशय, अधून मधून पांढरी फुले फुललेली, जलाशया भोवतीचा रस्ता, शेजारून चढत जाणारी वाट सगळेच सुंदर होते.
आमच्या चार दिवसांच्या ट्रेकचा मार्ग असा होता. पहिला आणि सहावा दिवस सारी ते ऋषिकेश प्रवासासाठी होता. 
📷Indiahikes Website 

पण अर्थातच देवरियाताल च्या जवळ एखादा गाडीने येण्याजोगा रस्ता असणार.  सारी ते देवरियाताल ह्या जंगलातून डोंगरातून येणाऱ्या संपूर्ण रस्त्यात आम्हाला फक्त दोन स्थानिक महिला, त्याही  फांद्या आणि लाकडे जमा करण्यासाठी आलेल्या दिसल्या. 
पण देवरियातालच्या भोवती मात्र अनेक पर्यटक होते. फोटोज, सेल्फीज, रील्स साठी चित्रविचित्र गोष्टी करत होते. जवळच वनविभागाची केबिन होती. वनाधिकाऱ्यांनी पाण्यात जायला, पाण्यात काही टाकायला मनाई केलेली असताना देखील लोक पाण्यात उतरू पाहत होते. मग त्यांना अडवायसाठी वनाधिकाऱ्यांच्या शिट्ट्या वाजत होत्या. खरे तर ही वर्दळ आणि आवाज आपल्या शहरांशी तुलना करता, ०. ००१ % देखील नसेल. पण काही तास जंगलातील शांतता  अनुभवल्यावर इतका आवाजदेखील नकोसा वाटत होता. येणाऱ्या पर्यटकांनी टाकलेला थोडाफार कचरा आजूबाजूला दिसत होता. ते सगळे पाहून आपण बेजवाबदार पर्यटक नसून जबाबदार ट्रेकर आहोत ह्याचे हायसे वाटले. 
आमचा त्या दिवशीचा कॅम्प देवरियाताल येथेच होता. पण वनविभागाची तलावाजवळ कॅम्पिंग करायला परवानगी नसल्याने तिथून साधारण ५०० मीटर अंतरावर, त्याच वाटेने चढत जाऊन मग कॅम्प येणार होता.
आज सारीपासून देवरियाताल पर्यंत येताना आम्ही ६५६० फुटांपासून ते ७८१० फुटांपर्यंत मजल मारली होती.
📷 Supan Shah
Devriatal Camp📷 Sneha Tilak
कॅम्पवर पोचल्यावर जेवण झाले. कितीही दमला असाल तरी झोपू नका असे आम्हाला ट्रेकलीडर साहिल ने सांगितले होते. त्यामुळे जेवण झाल्यावर अजून उंचावर एक व्ह्यू पॉइंट होता तिथे जाऊन निवांत बसलो. 360 अंशातून दिसणाऱ्या पर्वतरांगा, थोडे धुके, थोडे ढग, बूरांश ची फुललेली झाडे, झाडांच्या आडून डोकावणारे देवरिया ताल ..ते दृश्य आता आठवणीत कायम राहणार आहे.
थोड्या वेळाने आम्ही सगळेजण पुन्हा देवरियाताल जवळ गेलो. तिथेच आमचे दुपारचे खाणे आणि चहा असणार होता. आता जवळपास सगळे पर्यटक परत गेले होते. आम्हां २५ जणांखेरीज  अगदीच एखाददुसरे कोणी त्या परिसरांत असेल. 
Sukun - Relaxed moment @ Devriyatal
Contemplative Devariatal
📷 Sneha Tilak
संध्याकाळच्या तिरप्या सूर्यकिरणांनी तळ्याचे रूप तर बदलले होतेच. आमच्या सगळ्यांचा मूड देखील बदलला होता.
📷 Sneha Tilak
थंडी आता चांगलीच जाणवू लागली होती. सगळ्यांनी स्वतःला जॅकेट्स आणि कॅप्स मध्ये लपेटून घेतले होते. आमचे ट्रेक गाईड अमितजी ह्यांनी तिथे आम्हांला यक्षप्रश्न ची कथा इतकी रंगवून सांगितली की ऐकण्यात आम्ही मग्न होऊन गेलो होतो.
📷 Samrat Darda
यक्षाच्या प्रश्नांना युधिष्ठिराने उत्तरे दिली. कथा संपली. आता स्वतःच्या मनातील विचारांना निरखत, सूर्यास्त अनुभवत त्या निरव वातावरणात आम्ही शांतपणे बसलो होतो.
कहीं दूर जब दिन ढल जाए,
साँझ की दुल्हन बदन चुराए
📷 Sumati Dhembre
📷 Sneha Tilak
📷 Samrat Darda
सूर्यास्त झाला. आता कॅम्पवर परत जायची वेळ झाली. पण इतक्या सुंदर ठिकाणी एक ग्रुप फोटो तर व्हायलाच हवा ना?!!
काल सकाळी अनोळखी असलेलो,पहिल्यांदा भेटलेलो आम्ही २२ जण आणि आमचे ट्रेक लीडर, ट्रेक गाईड असे तीन जण , आज संध्याकाळपर्यंत मैत्रीच्या धाग्याने जोडलो गेलो होतो. 
TEAM



#deoriatal #chopta #uttarakhand #chandrashila #deoria #tungnath #sarivillage #himalayas #uttarakhandheaven #mountains #instagram #trekking  #travel  #motivations #indiahikes 





Comments

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...