Skip to main content

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक- भाग 1 - तयारी !!

 आपण स्वप्न पाहतो… आपण स्वप्ने पाहतो… त्यातील एखाद दुसरेच प्रत्यक्षात यावे म्हणून धडपडतो आणि बाकीची स्वप्ने कधीतरी नवलाईने आंजारायला गोंजारायला असावीत म्हणून त्यांना स्वप्न म्हणूनच राहू देतो. 

हाय अल्टिट्युड ट्रेक हे माझे एक असेच स्वप्न होते, नेहमी भुरळ पाडणारे आणि तरीही प्रत्यक्षात आले तर इतक्या उंचीवर चालताना काहीशी धास्तीच वाटावी असे. त्यामुळे वर्षानुवर्ष ते स्वप्न प्रत्यक्षात न येता स्वप्नच राहिले होते. 

नोव्हेंबरमध्ये माझी मैत्रीण धनश्री जगताप इंडियाहाईक्सबरोबर देवरिया ताल चंद्रशिला हा ट्रेक करून आली. तिच्याशी गप्पा मारताना या ट्रेकची सविस्तर माहिती मिळाली. मार्च एप्रिलमध्ये या संपूर्ण रस्त्यावर ऱ्होडोडेंड्रॉनची फुले फुललेली असतात असेही कळले… आणि मनातल्या स्वप्नाला पुन्हा एकदा जाग आली. 

असे म्हणतात की देवरिया ताल म्हणजे जिथे यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारले ते तळे. वाटेत लागणारे तुंगनाथ हे तर जगातले सर्वात उंचावर असणारे शंकराचे मंदिर, पंच केदारापैकी एक. हे पांडवांनी बांधले आहे असे सांगितले जाते. ट्रेकचा समिट पॉईंट म्हणजे चंद्रशिला. जिथे चंद्राने तपश्चर्या केली ती जागा. असेही म्हणतात की राम रावण युद्धानंतर रामाने इथे तपश्चर्या केली होती. शिवाय ऱ्होडोडेंड्रॉन किंवा बुरांश या फुलांनी फुललेली जंगले हे देखील मोहात पाडायला पुरेसे होते. पाय मागे खेचणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे या ठिकाणांची उंची!!! बारा हजार फूटांच्यापेक्षाही जास्त उंचीवर, हवा विरळ असताना, आपल्याला नीट श्वास घेता येईल का नाही याची भीती मनात होती. पण ह्या ट्रेकला गेले तर सोबत स्नेहा, केदार, राजश्री असणार होते. मग हिंमत गोळा करून रजिस्ट्रेशन केले आणि सुरू झाली ट्रेकची तयारी. 


रजिस्ट्रेशन केल्या गेल्या टीएमटी टेस्ट करून घेतली. 58 वर्षांवरच्या प्रत्येकासाठी इंडिया हाईक्सने ट्रेडमिलटेस्ट अनिवार्य केली आहे. ती नॉर्मल आल्यावर मग ट्रेक च्या फिटनेसच्या तयारीला सुरुवात केली. इंडिया हाइक्स फिटनेस विषयी खूपच जागरूक असते आणि फिटनेस सर्टिफिकेट मिळाल्याखेरीज तुम्हाला ट्रेकला जाता येत नाही. त्यामुळे मग वेगाने चालणे, भरपूर चालणे, त्याचे रेकॉर्ड् ठेवणे, जिने चढणे उतरणे, जवळपासच्या ठिकाणी हाईकना जाणे हे सुरू केले. 


पण म्हणतात तसे सगळेच सुरळीत पार पडत असले तर मग आयुष्यात थ्रिल ते काय !! टाच दुखायची थांबली होती, तिच्या लक्षात आले की आपले महत्व कमी होते आहे. तिने परत आपले स्वतंत्र अस्तित्व आणि इच्छा जाणवून द्यायला सुरुवात केली. मी टाच टेकायची म्हटली रे म्हटली की अशी काही चवताळून उठायची टाच, की मी आपली म्हणणार, “बरं बाई, तुझ्या मनासारखे ..नाही टेकत..मग तर झाले?!!! “ पण चालायला गेल्यावर मात्र मी तिचे काहीच ऐकत नाहीये असे तिच्या लक्षात आले. मग आपोआप सुतासारखी सरळ आली. अर्थात त्यासाठी माझ्या योगशिक्षिका ऋचा ताईंना विचारून पायाचे व्यायाम करायला सुरुवात केली होती. शिवाय एक छान गोल बाटली पावलाखाली धरून ती जोरात दाबून मागेपुढे गोल गोल फिरवायची असेही केले. त्या सगळ्याचा परिणाम म्हणून टाच एकदम शान्त ..म्हणजे बरी झाली. 

टाचेचे प्रकरण निभतंय की नाही तो अचानक डोळाच लाल झाला. एक दिवस वाट पाहून गेले डॉक्टरांकडे. कारण हाय अल्टीट्युड ला आणखी काही व्हायला नको. डॉक्टरांनी ड्रॉप्स घालायला दिले. पण दोन दिवसांनी तर डोळा इतका लालभडक झाला की मी आरामातच असले तरी माझ्याकडे पाहणाऱ्यांना माझा डोळा पाहवेना! परत माझी डॉक्टरांकडे फेरी. डॉक्टर म्हणाल्या की ही डोळा बरे होण्यातील एक स्टेज आहे आणि मी सुटकेचा नि:श्वास टाकला. तसेही आत्तापर्यंत माझा 'टाच दुखो की डोळा लाल होवो, आपण ट्रेकला जायचे म्हणजे जायचेच' असा दृढ का काय तो निश्चय झालाच होता!! 


मनाची आणि शरीराची अशी तयारी झाल्यानंतर सुरू झाली सामानाची जमवाजमव. आमच्या आधी ह्याच ट्रेकला जाऊन आलेला आमचा मित्र स्वप्नील लाखे म्हणाला होता की आपण ट्रेक साठी दहा हजार रुपये भरतो आणि ट्रेक साठीची खरेदीच 25 हजारांची करतो!! ते लक्षात होते. त्यामुळे कमीत कमी गोष्टी विकत घ्यायच्या असे ठरवले होते. 


ट्रेकसाठीचे विशेष बूट मात्र आधीच विकत घेतले आणि ते घालून चालायची प्रॅक्टिस केली. बूट आणि पावले ह्यांना एकमेकांची संगत सुसह्य व्हायची तर असे करणे आवश्यकच होते. ट्रेकिंग पोल्स आणि हेड लॅम्प्स हे इंडिया हाईक्सकडून भाड्याने घेतले. बाकी सामानापैकी घरात काही होते. भाचेसून आणि भाचा ट्रेक्सना जात असतात. त्यांचे काही सामान घेतले. बहिणीकडे थंडीत घालायची हलकी जॅकेट्स होती. ती घेतली आणि म्हणतात तसे सोंग सजले!! 


फिटनेस सर्टिफिकेट मिळाले आणि मग खऱ्या उत्साहाने ट्रेकची बॅग भरायला सुरुवात केली. कमीत कमी सामान न्यायचे, ड्रायफिट आणि हलके कपडे न्यायचे हे ठरवले होते. तयारीसाठी इंडिया हाईक्सच्या अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत, त्याचा खूप फायदा झाला. 


जरी हा एप्रिलमधला आणि स्प्रिंग हाईक होता, तरी कपड्यांचे तीन ते चार थर आवश्यक असणार होते. कारण तापमान बहुतेक दिवशी एक अंकीच असणार होते. शेवटच्या टप्प्यात बर्फही लागणार होता. त्या विचारानेच हुडहुडी भरत होती. कारण गेली अनेक वर्षे तापमान किमान विशीत खरे तर तिशीतच असायची सवय झाली होती. थंडीसाठी आवश्यक ते सगळे सामान भरले आणि डेहराडूनला जाणाऱ्या विमानात बसले. डेहराडून हुन आम्ही ऋषिकेशला टॅक्सीने जाणार होतो आणि तिथून ट्रेकमधील सर्वजण सोबतच सारीला म्हणजे बेसकॅम्पला जाणार होतो. 


वयाच्या साठीमध्ये आयुष्यातला पहिल्या हाय अल्टीट्युड ट्रेकसाठी निघताना मनात अपार उत्सुकता दाटून आली होती. सुरुवातीला वाटणारी भीती बरीचशी कमी झाली होती. डेहराडूनचा विमानतळ लहानसा,आटोपशीर, स्वच्छ आणि सुंदर आहे. बाहेरच्या सर्व खांबांवर गायत्री मंत्र कोरलेला आहे. आम्ही पोहोचलो तेव्हा सूर्याचे मावळते किरण त्या खांबांवर पडलेले होते. 

 

डेहराडून पासून ऋषिकेश टॅक्सीने साधारण अर्ध्या तासावर आहे. दुसऱ्या दिवशी ऋषिकेश मध्ये थोडेफार हिंडलो, काही खरेदी बाकी होती ती केली. तिसऱ्या दिवशी सकाळी इंडियाहाइक्स सांगितलेल्या ठिकाणी एकत्र जमलो आणि टीम मधले सर्वजण सोबतच सारी येथील बेस कॅम्पला गेलो.


📷Kedar Tembe 

अशी तीन वाहने होती. सकाळी साडेसात आठ ला ऋषिकेशहुन निघालेलो आम्ही, सारीला पोचायला दोन अडीच वाजले होते.

 

📷Supan shah 

त्यापुढे मग जे सामान भाड्याने घेण्यासाठी नोंदवले आहे ते ताब्यात घेणे, एकमेकांची ओळख, ट्रेक लीडर, ट्रेक गाईड्सची ओळख सत्रे झाली. प्रत्येकाचे फॉर्म्स चेक करून ट्रेक लीडर साहिल प्रत्येकाशी वैयक्तिकरित्या बोलला. नंतर ट्रेक मध्ये घ्यायची काळजी, नियम हे सगळे आम्हाला ट्रेक लीडर आणि ट्रेक गाईड्सनी समजावून सांगितले.


सारी कॅम्प मधून चंद्रशिला दिसते, ते बघताना, आपण चार दिवसांत तिथे, इतक्या उंचीवर असणार आहोत हे खरेच वाटत नव्हते. 


चंद्रशिला 

टेन्ट मधील बंकबेड्स, पाणी असलेली टॉयलेट्स, बसायला बाके आणि समोर टेबल असलेले जेवण घर ही ट्रेक मधली शेवटची चैन बेसकॅम्पमध्ये अनुभवली!! तसेही अंघोळ नामक प्रकार तर ट्रेक संपल्यावर परत ऋषिकेश मुक्कामी गेल्यावरच करता येणार होता!! रोज आंघोळ करणे ही अंधश्रद्धा आहे असेच सर्व ट्रेकर्सचे मत असावे!! 


📷Samrat Darda 





#deoriatal #chopta #uttarakhand #chandrashila #deoria #tungnath #sarivillage #himalayas #uttarakhandheaven #mountains #instagram #trekking #travel  #mountains #inspiration  #motivational #indiahikes




Comments

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...