Skip to main content

चला पक्षीजगताच्या प्रवासाला.

आजदेखील सफरच आहे ... पण पक्षीराज्याची. हे सगळे पक्षी टिपायला कुठे जंगलात किंवा पक्षी अभयारण्यात जावे नाही लागले. हे आहेत भर मुंबईत, नागरी वस्तीत दिसलेले पक्षी. 

तसे तर आपल्या सगळ्यांनाच पक्षी दिसतात. पण त्यांच्या येण्याजाण्याच्या वेळा लक्षात ठेवून, कॅमेरा सज्ज ठेवून त्यांची छायाचित्रे घेणे काही प्रत्येकाला जमत नाही. त्यासाठी पारखी नजर आणि आवड हवी. ह्या सर्व सुंदर छायाचित्रांचे छायाचित्रकार आहेत डॉ. प्रफुल्ल चितळे.

प्रत्येक छायाचित्र सुंदर आणि बारकावे टिपणारे. साधारणपणे, ' वा! छान!!" म्हणून आपण थांबतो. पण शब्दांचे ज्यांना वरदान असते ते जणू त्या छायाचित्रातील भाव शब्दात उतरवतात. प्रत्येक छायाचित्राला समर्पक ओळी लिहिल्या आहेत अंजली चितळे ह्यांनी. 

चला तर मग पक्षीजगताच्या प्रवासाला. मी म्हटले की हा पक्षीजगताचा प्रवास.. पण हा तर ठरला कलाजगताचा प्रवास. छायाचित्रकाराने काढलेली पक्ष्यांची सुंदर छायाचित्रे, ती पाहून कवयित्रीला सुचलेले शब्द आणि तेच पाहून कलावंतांना काढावीशी वाटलेली रांगोळी. आता ह्या पोस्टमध्ये काही रांगोळ्या पण समाविष्ट झाल्या आहेत! रांगोळ्या काढणाऱ्या शुभदा बर्वे आणि प्रज्ञा खरे ह्या काही प्रशिक्षण घेतलेल्या किंवा व्यावसायिक  रंगावलीकार नाहीत. पण अंगात असलेली कला आणि सत्तरी पंचाहत्तरीच्या वयात देखील असलेला अपार उत्साह त्यांच्या रांगोळीत दिसतो. तेव्हा आता पक्ष्यांच्या रांगोळ्यांचादेखील आनंद घेऊ या!

हळद्या

रंगावली - शुभदा बर्वे 

हळद्या
पिवळे अंग, काळे पंख
डोळ्यांत काजळ, लाल चोच
किती रे तुला रंगांचा सोस?
 
कोकिळा 

कोकिळा
ठिपक्या ठिपक्यांची पांघरून शाल
लाल डोळ्यांनी किती पहाल?
यायचाय अजून आंब्याला मोहर
कोणत्या झाडावर बसाल तंवर?
 
फुलचूखी 

फुलचुखी
एवढंसं पाखरू, 
लागलं भिरभिरु
प्रत्येक फुलात खुपशी चोच
मधाचा याला भारीच लोभ
 
कबुतर 
 
रंगावली - शुभदा बर्वे 

कबुतर
काँग्रेसचा दिलाय राजीनामा,
करतात सगळे खाणाखुणा
पण कोणीच राजरोस पक्षात घेईना!
 
साळुंकी 

साळुंकी
तू तर आमची चित्रनेत्रा
मेक अप केलाय काय
भरतनाट्यमकरिता!
 
साळुंकी जोडी 

साळुंकी जोडी 
थंडीचा पडलाय कडाका,
ऊन खायाला येताय् का?
 
कोतवाल 

कोतवाल
मी आहे कोतवाल,
नजर माझी भारी
लहान लहान पाखरांवर 
करतो दादागिरी.

सुतार पक्षी 

सुतार पक्षी
पिवळे केशरी घातले टोपडे
काळे पांढरे माझे झबले
लांब करडी मोठी चोच
लाकडात खुपसू बघतोय बघ.
 
शिंपी 

शिंपी
मी आहे शिंपी,
करतोय गणती,
 'Mask' शिवायला 
पानं लागतील किती?

पोपट 

पोपट
लाल टोपी, हिरवा कोट,
गळ्यात बांधलाय काळा गोफ
पाहून घ्यावा नोक,झोक
उणे काढायला नाहीच स्कोप.

तांबट 

तांबट
निळी चोच,पोपटी गळा
खाली,वर केशराचा मळा
हिरवे पंख,करड्या अंगी
पायांना लावलीय चुटुक मेंदी
रंगीबेरंगी माझे पिवळे अंग
सांगा,कोणता उरलाय रंग?

रंगावली - प्रज्ञा खरे 

नुकतेच कोषातून बाहेर पडलेले फुलपाखरू 

 नुकतेच कोषातून बाहेर पडलेले फुलपाखरू
  चिकटलेले पंख चिमुकले
प्रकाशात येता झगमगले
फुला फुलांवर राहीन विहरत 
आनंदाने वेचिन  मधुकण

जन्माची तयारी 

जन्माची तयारी
एवढासा जीव,पण म्हणतोय कसा
जाताना सोडून जाईन ठसा
रंगांची नाजुक नक्षी
ठेवीन मी बाळांसाठी.



इतके पक्षी आपल्या अवतीभोवती असतात. त्यांना पाहण्याची दृष्टी मात्र हवी.
पक्ष्यांकडून आपल्याला खूप शिकतादेखील येईल.  इथे आठवते आहे बालकवींची कविता -आनंदी पक्षी.

आनंदी पक्षी
केव्हां मारुनि उंच भरारी । नभांत जातो हा दूरवरी,
आनंदाची सृष्टी सारी । आनंदें भरली.

आनंदाचे फिरती वारे। आनंदानें चित्त ओसरे,
आनंदें खेळतो कसा रे । आनंदी पक्षी!

हिरवें हिरवें रान विलसतें। वृक्षलतांची दाटी जेथें,
प्रीती शांती जिथें खेळते । हा वसतो तेथें.

सुंदर पुष्पें जिथें विकसलीं। सरोवरीं मधु कमलें फुललीं
करीत तेथें सुंदर केली । बागडतो छन्दें.

हासवितो लतिकाकुंजांना। प्रेमें काढी सुंदर ताना,
आनंदाच्या गाउन गाना । आनंदें रमतो.

जीवित सारें आनंदाचें । प्रेमरसानें भरलें त्याचें;
म्हणोनिया तो रानीं नाचे । प्रेमाच्या छन्दें!

आम्हांकरितां दुर्धर चिंता। नाना दु:खें हाल सभोंता,
पुरे! नको ही नरतनु आताम । दु:खाची राशी!

बा आनंदी पक्ष्या, देई । प्रसाद अपुला मजला कांहीं,
जेणें मन हें गुंगुन जाई । प्रेमाच्या डोहीं.

उंच भरार्‍या मारित जाणें । रूप तुझें तें गोजिरवाणें!
गुंगुन जाइल चित्त जयानें । दे, दे तें गाणें!

- बालकवी


# birds #Birdwatching #BirdsInMumbai # Balkavi #Happybirds

Comments

  1. फोटोज आणि आोळी दोन्ही सुंदर 👌
    कबुतर जास्त आवडल 🙂

    ReplyDelete
  2. सुंदर फोटो व कविता

    ReplyDelete
  3. फारच छान सफर झाली पक्षांच्या आणि काव्याच्या दुनियेची.

    ReplyDelete
  4. चारोळ्यांसह पक्षी जगताची मौजदार सफर

    ReplyDelete
  5. प्रफुल्लची पक्ष्यांची फोटोग्राफी तसेच अंजलीवहिनींची साजेशी कविता व नेमके रंग व गुणांचे चपखल वर्णन.खूप अभिनंदन दोघांचे.

    ReplyDelete
  6. डॉक्टर प्रफुल यांनी काढलेली सर्व छायाचित्रे अप्रतिम तर आहेतच पण अंजली यांनी प्रत्येक पक्षांची काव्यातून करुन दिलेली ओळख खूपच छान आहे.दोघांचेही अभिनंदन!

    ReplyDelete
  7. Photo baghoon and kavita wachoon chan waTla - Vrunda T, Prafull Chitale.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 4 - स्यालमी - बनियाकुंड

आदल्या संध्याकाळी भुरभुरत असलेल्या पावसाने हवेतला गारवा अजूनच वाढवला होता. इतक्या लहान तंबूमध्ये झोपण्याची पहिलीच वेळ होती. पण सुरुवातीचे दोन तास सोडले तर नंतरचे पाच तास चांगली झोप झाली. अगदी प्रसन्न जाग आली.काल एकदाच क्षणभर का होईना, मनात तरळून गेलेला,"आपण ट्रेक इथेच थांबवावा का?"ह्या विचाराचा आज कुठे मागमूसही उरला नव्हता. मनात होते,  "इरादे अगर पक्के हो, तो डगमगाए कदम क्यु? हौसले बुलंद हो तो सहमा सा हो मन क्यु? मंज़िल अब दूर नहीं.. बस संभल के चलना, कभी न रुकना, हार ना मानना, बस्स .. चलते रहना।" - वृंदा टिळक आमच्या सगळ्याच कॅम्पसाईट्स भन्नाट जागांवर होत्या. आजची स्यालमीची कॅम्प साईट देखील त्याला अपवाद नव्हती. नजर पोचेल तिथपर्यंत फक्त पर्वत रांगा आणि जंगल. मानवी वस्तीची जवळपास काहीच चाहूल नाही.  📷Samrat Darda  सगळ्यांचे आवरून वॉर्म अप करून आम्ही निघालो. आजचा सगळा रस्ता सुंदर असणार होता. काल इतके चढ उतार चढून उतरून आता सगळ्यांची चांगली तयारी झाली होती. शिवाय आज मी नीकॅप्स देखील घातल्या होत्या!! त्यामुळे समजा जरी आज रस्ता अवघड असला असता तरी काळजीचे काही कारण नव्हते....

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 3 - देवरियाताल -स्यालमी

ट्रेकचा तिसरा दिवस. कालचा सारी- देवरियाताल प्रवास तर खूपच छान झाला होता. पायही दुखले नव्हते की थकल्यासारखे देखील वाटले नव्हते. त्यामुळे उत्साहाने आजच्या दिवसाला सुरुवात केली. आजचा दिवस तसा अवघड असेल अशी, इंडियाहाईक्सच्या  वेब साईटवरचे वर्णन वाचून कल्पना आली होती. आज अंतर नऊ किलोमीटरपेक्षा जास्त होते. पण वाटेत अनेक शिखरे दिसणार होती. घनदाट जंगलातून जाणार होतो त्यामुळे अनेक पक्षीही दिसणार होते. त्याचीही उत्सुकता होती. सगळेजण देवरियाताल कॅम्पसाईट मधून बाहेर पडलो. अवघे एक दिवस वास्तव्य केलेले असले तरी मन थोडेतरी गुंतलेले असतेच.  देवरियातालच्या रस्त्याच्या डाव्या बाजूने एक जंगलवाटेचा फाटा होता. त्या वाटेने आम्ही निघालो. थोडा वेळ चालल्यावर आम्हाला पुन्हा एकदा चंद्रशिला शिखर दिसणार होते. अधून मधून दिसणारे हे शिखर आपल्याला कुठे पोचायचे आहे त्याची जाणीव करून द्यायचे, त्यानेही एक नवे बळ मिळायचे. पण आज आकाश इतके ढगाळ होते की शिखर दिसलेच नाही.उजवीकडे पुन्हा एकदा सारी गाव मात्र दिसले. 📷Cotrekker 📷Sumati Dhembre ह्या फोटोवरून कशा रस्त्याने आम्ही चालत होतो, चढ किती होता त्याची कल्पना येईल....

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 5- अंतिम भाग - बनियाकुंड- तुंगनाथ- चंद्रशिला

  📷Samrat Darda १५ एप्रिल, बनियाकुंड कॅम्पसाईट मधून काढलेला चंद्राचा सुंदर फोटो. त्या दिवशी शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा अष्टमी असावी. कारण १७ एप्रिलला रामनवमी होती. सुंदर काळ्याभोर रात्रीचा सघन अंधार.. पौर्णिमा अजून साताठ दिवसांवर असली तरीही आत्तापासूनच तेजाळलेला चंद्र.. चमचमणारे, मध्येच ढगांच्या आड लपणारे चांदणे, आमच्या मनातील समिटविषयीची उत्सुकता..फार अनोखी रात्र होती ती.  उद्या पहाटे दोन वाजताचा वेकप कॉल असणार होता. आम्हाला आवरून, ब्रेकफास्ट करून तीन वाजता निघायचे होते. न विसरता घेण्याच्या गोष्टी तशा तर डे पॅक मध्ये भरूनच ठेवल्या होत्या. हेडलॅम्पच्या उजेडात सामान देखील आवरून ठेवले होते. पहाटे निघताना बाकी सामान मेन टेन्ट मध्ये नेऊन ठेवायचे होते.  इतक्या उंचीवर जायचे होते. काही तासांत आम्ही ४००० फुटांचा अल्टीट्युड गेन करणार होतो. झोपण्यासाठी डोळे मिटले खरे, पण मिटल्या डोळ्यांपुढेही बर्फाच्छादित शिखरांचीच दृश्ये तरळत होती. कधीतरी झोप लागली. सतत अधूनमधून जाग येऊन घड्याळात बघत होते. सगळे दोन वाजता उठणार, त्या आधी आपण आपले आवरून घेऊ या असा विचार डोक्यात होता तो बहुधा सतत ज...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...