Skip to main content

सिंगापूर- नित्यनूतन नगर

फारा वर्षांपूर्वीची गोष्ट! 'संग नील उत्तम' शिकारीला निघाला होता. शिकारीसाठी पुढे जात जात तो एका नव्या प्रदेशात येऊन पोचला. तिथे त्याला एक अगदी वेगळाच प्राणी ओझरता दिसला. त्याला वाटले तो सिंहच आहे आणि म्हणून त्याने त्या नव्या प्रदेशाला नाव दिले 'सिंगापुरा '. 

हे नाव आले होते संस्कृत शब्द सिंह आणि पुरा म्हणजे गाव, शहर ह्यावरून. सिंहपुर, सिंगापुरा!

'संग नील उत्तम' होता श्रीविजय साम्राज्याचा राजपुत्र. इतिहासाला तो 'श्री त्रि बुआना' म्हणून देखील ज्ञात आहे. श्री त्रि बुआना ही त्याची पदवी होती, अर्थ होता श्री त्रिभुवना - स्वामी तिन्ही जगांचा!

शतके लोटली. राज्यकर्ते बदलले. अनेक राजवंश प्रसिद्ध झाले आणि लुप्तदेखील झाले. सिंगापुरा अगदी मोक्याच्या जागी असल्याने मालवाहतुकीसाठी, व्यापारासाठी महत्वाचे बंदर म्हणून नावारूपाला आले. 

मग सिंगापुराचे सिंगापूर कसे झाले? नेहमीप्रमाणे ह्या बदलाचे कारण होता एक ब्रिटिश अधिकारी सर थॉमस रॅफल्स. त्याने १८२२ मध्ये सिंगापुरा जिंकले आणि ब्रिटिश साम्राज्यासाठी एक व्यापारी बंदर म्हणून हा देश विकसित केला. जेते आपल्याला हवे तसे जिंकलेल्या देशाचे नाव बदलतात हे जगजाहीर आहेच.. तर असे झाले सिंगापुराचे सिंगापूर. 

त्या नंतर सिंगापूरने अनेक उतार चढाव अनुभवले. दुसऱ्या महायुद्धात जपान्यांनी आक्रमण केले आणि ब्रिटिशांकडून फेब्रुवारी १९४२ मध्ये सिंगापूर हिसकावून घेतले. तीन वर्षांनी चक्र फिरले, जपानला शरणागती पत्करावी लागली आणि सिंगापूर पुन्हा एकदा ब्रिटिश अंमलाखाली आले. 

परिस्थिती सतत बदलत राहिली आणि अखेरीस ९ ऑगस्ट १९६५ ला सिंगापूर स्वतंत्र झाले. जरी स्वतंत्र देशाचे नाव अजूनही सिंगापुरा नसून सिंगापूरच असले तरी राष्ट्रगीतात मात्र बेरजया सिंगापुरा ( सिंगापुरा यशस्वी होवो. ) 'बेरजाया 'मलेशियन भाषेतील शब्द असून त्याचे मूळ बहुतेक संस्कृत मधील 'विजयी ' हा शब्द असावे. सिंगापुरा हा उल्लेख अजूनही एकदा येतो राष्ट्रगीतात, तो म्हणजे 'मजुला सिंगापुरा '. त्याचा अर्थ आहे सिंगापुरा सतत पुढे जात राहो, विकासमान होवो. सिंगापुरा हे नाव अशा रीतीने नागरिकांच्या मनात रुळत राहते. 

स्वातंत्र्यप्राप्तीपासून ते आजपर्यंत सिंगापूरने खूप मोठा पल्ला गाठला आहे. आज सर्व उद्योगांना आपले ऑफिस सिंगापूरमध्ये असावे अशी निकड भासते. जगातील सर्वात मोठ्या मालवाहू बंदरांपैकी एक, जगभरातील प्रवाशांचे आवडते ठिकाण अशी आणि अश्या अनेक ओळखी निर्माण करून सिंगापूर, हा छोटासा लाल ठिपका जगाच्या नकाशावर अभिमानाने झळकत आहे. 

सिंगापूर असा देश किंवा खरे तर असे शहर आहे, जिथे सतत काहीतरी बांधकाम चालू असते. मग ती नवीन रेल लाईन असेल, नव्या इमारती असतील किंवा प्रवाश्यांसाठी नवी आकर्षणे निर्माण करणे असेल, बांधकाम सतत चालू असते. सतत बदल हीच इथली न बदलणारी गोष्ट आहे! 

आम्ही जेव्हा सिंगापूरला २००५ मध्ये आलो होतो तेव्हा मरिना बे सँड्स आणि गार्डन्स बाय द बे दृष्टीपथात पण नव्हते. तेव्हा सिंगापूरचे चिन्ह असायचे मर्लायन आणि एस्प्लनेड. चला सिंगापूरच्या सफरीला अशी प्रवासी कंपन्यांची पत्रके असायची त्यावर देखील ह्याच दोन्हीचे फोटोज असायचे!! 

Esplanade
P.C. Sneha Tilak 

Merlion
P.C. Sneha Tilak 

आता सिंगापूर फ्लायर - जायन्ट व्हील, मरिना बे सँड्स, स्काय पार्क, इन्फिनिटी पूल, गार्डन्स बाय द बे, आर्टस् अँड सायन्स म्युझियम्स... इतकी सारी नवी आकर्षणे आहेत. प्रवासी कंपन्यांना सतत आपली सिंगापूर माहितीपत्रके बदलत राहायला लागत असणार!! 
ही सध्याची म्हणजे फेब्रुवारी २०२२मधील सिंगापूरची स्कायलाईन.
 
Trying to capture Singapore Skyline
P.C. Sneha Tilak 

 
खूप जोरदार वाऱ्याचा आणि ढगाळ आकाशाचा दिवस होता तो. पण वातावरण मात्र अगदी प्रसन्न होते. वरच्या फोटोत मी जो विडिओ काढते आहे तो हा - 


Merlion


Reflections! 

Near Arts and Science Museum. 

Marina Bay 

Arts and Science museum and Marina Bay Sands ( 2015)

Cloud Forest and Singapore Flyer ( 2015)

Cloud Forest and Flower Dome 
Gardens By the Bay 2015

Making Of Super Tree Grove (2015)

Super Trees Grove ( 2022) 

जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना सतत नवनवीन पर्यटन केंद्रे तयार करणारे, नित्यनूतन भासणारे सिंगापूर भुरळ पाडते ह्यात शंकाच नाही. ह्या आकर्षणाखेरीज आणखी सिंगापूर ज्यांना पाहायचे आहे अशा निसर्गप्रेमींसाठी अनेक तलाव आहेत, बागा आहेत. ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांच्यासाठी दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित अनेक ठिकाणे आहेत. काही अनेक शतकांपूर्वीचे सापडलेले अवशेष आहेत. 

काही कॅसिनोज आहेत, अनेक मॉल्स आहेत, शेकडो बार आहेत आणि हजारो उपहारगृहे आहेत! थोडक्यात काय तर प्रत्येकाला आपापल्या आवडीप्रमाणे बघायला, आनंद उपभोगायला सिंगापूरमध्ये काहीतरी आहेच! 

जेव्हा सिंगापूरवर इतक्या सगळ्या ब्लॉग पोस्ट्स आत्तापर्यंत लिहिल्या गेल्या आहेत, पर्यटकांनी लिहिलेले लेख आहेत, अनेक व्हिडिओज आणि फिल्म्स आहेत, अनेक चित्रपटांतून सिंगापूर दिसलेले आहे, तेव्हा मी माझ्या ह्या सिंगापूर सिरीज मध्ये नवे काय लिहिणार असा प्रश्न पडला असेल ना?! तर मी लिहिणार आहे, माझ्या नजरेला दिसलेल्या प्रसिद्ध सिंगापूराविषयी तसेच त्यातील काही कमी प्रसिद्ध ठिकाणांविषयी... तेव्हा वाचत राहा - सिंगापूर सिरीज. 

#WhatToSeeInSingapore #SingaporeTravel #GoSg #SingaporeAttractions #ExploreSingapore


Comments

  1. खूप छान सुरुवात.

    ReplyDelete
  2. येऊद्या नवंनवीन रंजक माहिती आणि खुसखुशीत टिप्पणी !

    ReplyDelete
  3. आता तर नक्कीच वाचणार

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...