मुख्य सामग्रीवर वगळा

नुवारा एलीया श्रीलंका - रामायणाच्या पाऊलखुणा 

नुवारा एलीया हे श्रीलंकेतील थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक सुंदर ठिकाण आहे. संपूर्ण वर्षभर तिथे प्रसन्न हवामानाचे वरदान लाभलेले आहे. थंड हवा आणि धुके हे तेथील वातावरणाला आगळे सौंदर्य प्रदान करतात. नुवारा एलीया नावाचा अर्थ आहे 'दिव्यांचे शहर' किंवा 'सपाट भागात वसलेले शहर'. आजूबाजूच्या डोंगराळ प्रदेशात खरेच ह्या शहरातले दिवे लांबून दिसत असतील.
नुवारा एलिया 
📷स्नेहा टिळक 
कँडी कडून नुवारा एलीया ला जाताना आम्ही श्री भक्त हनुमान मंदिर, रामबोधा इथे भेट दिली. चिन्मय मिशन, श्रीलंका ह्यांनी हे मंदिर स्थापन केलेले आहे. वेवन्दन पर्वतरांगांमध्ये, समुद्र सपाटीपासून ३२०० फुटांवर असलेले हे मंदिर व परिसर निसर्गरम्य आहे.
हे मंदिर मुख्य रस्त्याच्या जवळ आहे. अगदी चढाचा, गाडी जाऊ शकेल असा रस्ता आहे. नंतर मग थोडा चढ आणि पायऱ्या मात्र पायीच चढायला लागतात. आम्ही २०१३ मध्ये तिथे गेलो होतो, तेव्हा तरी तिथे लिफ्टची सुविधा नव्हती.
असे म्हणतात की हा तोच भाग आहे जिथे श्री हनुमान सीतामाईचा शोध घेत होते. ह्या मंदिरात हनुमानाची भव्य मूर्ती आहे. जवळपास १२-१५ फूट उंच अशी.
श्री भक्त हनुमान मंदिर, रामबोध 
📷स्नेहा टिळक 
श्री भक्त हनुमान मंदिर, रामबोध 
📷विकिमीडिया कॉमन्स 
श्री भक्त हनुमान मंदिर, रामबोध 
📷विकिमीडिया कॉमन्स 
डोंगरावर असल्याने ह्या ठिकाणाहून दिसणारे दृश्य फार सुंदर आहे. आजूबाजूचे डोंगर, हिरवाई, चहाचे मळे, नद्या, शांतता हे सर्व बघून मनाला पण खूप शांती मिळते.
श्री भक्त हनुमान मंदिर, रामबोध येथून दिसणारे सुंदर दृश्य 
📷स्नेहा टिळक 
श्री भक्त हनुमान मंदिर, रामबोध- मंदिर परिसर 
📷स्नेहा टिळक 
जवळ रामबोदा नावाचे धबधबे आहेत. हे नाव मुळात रामबोधाच असावे. श्रीलंकेत विशेषतः नुवारा एलीया च्या परिसरात अनेक धबधबे आहेत. घनदाट जंगलात असलेला हा धबधबा साधारण ३५० फुटांवरून खाली कोसळतो आहे.
 रामबोध धबधबा 
📷स्नेहा टिळक 
ह्या धबधब्यापासून आणि मंदिरापासून अगदी थोड्या किलोमीटर अंतरावर नुवारा एलीया शहर आहे.
नुवारा एलीया शहरात अनेक सुंदर सुंदर हॉटेल्स आहेत. मला नाव आठवत नाही आता, पण आम्ही उतरलो होतो ते हॉटेल म्हणजे मोठा, छानसा, दोन मजली बंगला होता. तिथेच जेवण, ब्रेकफास्ट अशी सोय होती.
हॉटेलकडे जाणारा रस्ता खूप अवघड होता. ड्रायव्हरला त्या भागाची माहिती होती म्हणूनच तो गाडी नेऊ शकला. अत्यंत अरुंद, बाजूला दरी असा तो रस्ता होता.
आमच्या हॉटेलचे प्रवेशद्वार होते, त्याच्या बाजूला बाग होती. त्या बागेला वळसा घालून आपण मागच्या बाजूला गेलो तर आपोआप हॉटेलच्या दुसऱ्या मजल्याच्या दारासमोर पोचायचो इतकी त्या रस्त्याला चढण होती!
हॉटेलमधून दिसणारे दृश्य 
📷स्नेहा टिळक 
हॉटेलमधून दिसणारे दृश्य 
📷स्नेहा टिळक 
पोस्ट ऑफिस 
📷स्नेहा टिळक 
ही विटांची सुंदर इमारत म्हणजे १९ व्या शतकात बांधले गेलेले पोस्ट ऑफिस आहे. ह्या इमारतीच्या सौंदर्यामुळे आणि ती जुन्या काळातील असल्याने आंतरराष्ट्रीय तिकीट दिनाच्या वेळी ह्या इमारतीचा फोटो असलेले पोस्टाचे तिकीट काढण्यात आले होते.
सभोवतालचे चहाचे मळे, बागा, प्रसन्न सुखद हवा ह्यामुळे नुवारा एलीया हे ब्रिटिश अधिकाऱ्यांचे आवडीचे सुट्टीत जाण्याचे ठिकाण होते. ह्याला 'मिनी इंग्लंड' असेही म्हटले जायचे.
आम्हाला मॅकवूडस लाबुकली नावाचा चहाचा कारखाना बघता आला. १८४१ मध्ये सुरु झालेला हा कारखाना खूप प्रसिद्ध आणि ह्या भागातील सर्वात मोठा कारखाना आहे.
चहा तोडणीपासून ते चहा तयार होण्याची प्रक्रिया आपण इथे बघू शकतो. शिवाय त्यांच्या रेस्टॉरंट मध्ये चहा आणि केक खाण्याचा आनंद पण अनुभवू शकतो... अर्थात पैसे देऊन!!
असे म्हणतात की ह्या कारखान्यातून लंडनच्या शाही कुटुंबाला चहा पाठवला जातो. खरे खोटे शाही कुटुंबाला माहिती!!
मॅकवूडस लाबूकली चहा कारखाना 
📷स्नेहा टिळक 
कारखान्याच्या अवतीभोवती सगळीकडे चहाचे मळे, लहान लहान टेकड्या आणि डोंगर आहेत. फार सुंदर दृश्य आहे. जवळच एक झरा किंवा खरे तर लहानशी नदीच वाहते आहे.
चहाचे मळे 
📷स्नेहा टिळक 
हे नुवारा एलीया जवळचे गायत्री मंदिर आहे. मंदिरातील मुख्य देवता गायत्री असली तरी तिथे १०८ शिवलिंगे देखील आहेत. रावणाचा मुलगा मेघनाद इथे शंकराची आराधना करायचा अशी आख्यायिका आहे.
गायत्री मंदिर 
📷स्नेहा टिळक 
ह्याच मंदिराच्या जवळ आम्ही खरे पारिजाताचे फुल पाहू शकलो. सुदैवाने तेव्हा फुलांचा ऋतू देखील होता. ते भलेमोठे झाड, वृक्षच अंगा खांद्यावर मोठाली पारिजाताची फुले वागवीत होता. तिथले पुजारी महोदय म्हणाले हे एकेक फुल झाडावर महिना महिना टिकते.
पण मनात हा खरंच पारिजात आहे का, अशी उत्सुकता होती. म्हणून शोध घेतला तर भारत सरकारच्या पोस्टाच्या तिकिटावर असेच पारिजाताचे चित्र आहे.
पारिजात
📷स्नेहा टिळक 
नुवारा एलीया हे श्रीलंकेतील अत्यंत सुंदर ठिकाणांपैकी एक आहे हे सतत जाणवत राहते. हिरवळीत गुरफटलेल्या टेकड्या, सुंदर शांत जलाशय, खळाळते झरे, उंचावरून कोसळताना तुषारांचा वर्षाव करणारे धबधबे, सगळेच फार सुंदर आहे. शांतवणारे आहे. शहराच्या मध्यभागी गजबज, वर्दळ आहे, पण ती देखील गुदमरवणारी नाही. अर्थात हे सगळे वर्णन २०१३ मधले आहे. संपूर्ण जगभरातच शहरीकरण वेगाने होते आहे. कदाचित नुवारा एलीया चे पण झाले असेल.
नुवारा एलिया 
ह्याच भागात रामायणाशी संबंधित अशी अनेक ठिकाणे आहेत. रामायणातील अनेक प्रसंगाची आठवण सतत होत राहते.
तिथे सीता एलीया मध्ये सीता अम्मन मंदिर आहे. इथेच सीतेला बंदिवासात ठेवलेले होते. इथे पहिल्यांदा हनुमानाला सीतामाई दिसली.
सीता अम्मन मंदिर 
📷स्नेहा टिळक 
सीता अम्मन मंदिर 
📷स्नेहा टिळक 
सीता अम्मन मंदिर 
📷स्नेहा टिळक 
सीता अम्मन मंदिर 
📷स्नेहा टिळक 
सीता अम्मन मंदिर 
📷स्नेहा टिळक 
श्री हनुमान पदचिन्हे, सीता अम्मन मंदिर 
📷स्नेहा टिळक 
मंदिराच्या मागील झऱ्यात हनुमानाची पदचिन्हे देखील दाखवली जातात. 
जिथे सीतेला बंदिवान करून ठेवलेले होते त्या परिसराला अशोक वन किंवा अशोक वाटिका म्हटले जात असे. आता ह्या परिसरात हकगल बोटॅनिकल गार्डन्स आहेत.
हाकागल बोटॅनिकल गार्डन 
कोणी म्हणतात की सिगिरियाला रावणाचा महाल होता. त्याविषयी आपण मागेच एका पोस्टमध्ये वाचले आहे. असे दिसतेय की रावणाचे अनेक ठिकाणी महाल होते.
त्यातील बरेचसे महाल हे गुहांच्या आणि भुयारी मार्गांच्या जाळ्याने जोडलेले होते. त्यामुळे रावणाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने जात येत असे. 
आम्हाला रावणाचे असेच एक निवासस्थान पाहायला मिळाले.
रावण एला गुंफा 
📷स्नेहा टिळक 
रावण एला गुंफा 
📷स्नेहा टिळक 
रावण एला गुंफामधून दिसणारे दृश्य 
📷स्नेहा टिळक 
रावण एला गुंफाकडे जाणारा रस्ता 
📷स्नेहा टिळक 
रावण एला गुहांकडे जाणारा रस्ता अगदी डोंगरातला, जंगलातला, चढणीचा असा आहे. कदाचित ज्येष्ठ नागरिकांना चढायला अवघड वाटू शकेल.
रावण एला गुहेच्या जवळच रावण धबधबादेखील आहे. त्या परिसरात अनेक धबधबे आहेत आणि त्यातल्या अनेकांना एकापेक्षा जास्त नावेदेखील आहेत!!
रावण धबधबा 
📷स्नेहा टिळक 
रामायणाशी संबंधित असे अजून एक महत्वाचे ठिकाण आम्हाला बघायला मिळाले ते म्हणजे सीतेने जिथे अग्निदिव्य केले ती जागा.
अग्निपरीक्षा 
📷स्नेहा टिळक 
हे झाड बोधीगयेतील मूळ बोधीवृक्षाची फांदी आहे असे म्हटले जाते. तिथेच एक बुद्ध मंदिर आहे. मागे एक प्राथमिक शाळा आहे. आम्ही गेलो तेव्हा बहुतेक मधली सुट्टी होती. त्या मुलांचा चिवचिवाट चालू होता!
श्रीलंका निसर्ग सौंदर्याने समृद्ध असा देश आहे. हवा उष्ण आणि दमट आहे. लोक बोलके आणि मदत करणारे आहेत.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली आहे. पण आपल्याला इतका वेळ नसतो. त्यामुळे खाजगी वाहन करणे सोयीचे ठरते.
आम्ही कोलंबो ते कोलंबो असे एक वाहन भाड्याने घेतले होते. संपूर्ण श्रीलंका प्रवासात ती गाडी आमच्यासोबत राहिली. स्थानिक भाषा व सामाजिक व्यवस्था जाणणारा वाहनचालक सोबत असणे चांगले असते.
शुद्ध शाकाहारी किंवा व्हीगन अन्नासाठी आम्हाला तेव्हा शोधाशोध करायला लागली होती. अर्थात ही २०१३ मधील गोष्ट आहे. आता स्थिती सुधारली असेल अशी आशा आहे.


#ramayan #Srilanka #footstepsoframayana #ravanresidence #nuwaraeliya #travelinsrilanka #tipsfortravelinsrilanka #whattoseeinsrilanka #visitsrilanka #ellasrilanka #seetainsrilanka


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....