Skip to main content

नुवारा एलीया श्रीलंका - रामायणाच्या पाऊलखुणा 

नुवारा एलीया हे श्रीलंकेतील थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक सुंदर ठिकाण आहे. संपूर्ण वर्षभर तिथे प्रसन्न हवामानाचे वरदान लाभलेले आहे. थंड हवा आणि धुके हे तेथील वातावरणाला आगळे सौंदर्य प्रदान करतात. नुवारा एलीया नावाचा अर्थ आहे 'दिव्यांचे शहर' किंवा 'सपाट भागात वसलेले शहर'. आजूबाजूच्या डोंगराळ प्रदेशात खरेच ह्या शहरातले दिवे लांबून दिसत असतील.
नुवारा एलिया 
📷स्नेहा टिळक 
कँडी कडून नुवारा एलीया ला जाताना आम्ही श्री भक्त हनुमान मंदिर, रामबोधा इथे भेट दिली. चिन्मय मिशन, श्रीलंका ह्यांनी हे मंदिर स्थापन केलेले आहे. वेवन्दन पर्वतरांगांमध्ये, समुद्र सपाटीपासून ३२०० फुटांवर असलेले हे मंदिर व परिसर निसर्गरम्य आहे.
हे मंदिर मुख्य रस्त्याच्या जवळ आहे. अगदी चढाचा, गाडी जाऊ शकेल असा रस्ता आहे. नंतर मग थोडा चढ आणि पायऱ्या मात्र पायीच चढायला लागतात. आम्ही २०१३ मध्ये तिथे गेलो होतो, तेव्हा तरी तिथे लिफ्टची सुविधा नव्हती.
असे म्हणतात की हा तोच भाग आहे जिथे श्री हनुमान सीतामाईचा शोध घेत होते. ह्या मंदिरात हनुमानाची भव्य मूर्ती आहे. जवळपास १२-१५ फूट उंच अशी.
श्री भक्त हनुमान मंदिर, रामबोध 
📷स्नेहा टिळक 
श्री भक्त हनुमान मंदिर, रामबोध 
📷विकिमीडिया कॉमन्स 
श्री भक्त हनुमान मंदिर, रामबोध 
📷विकिमीडिया कॉमन्स 
डोंगरावर असल्याने ह्या ठिकाणाहून दिसणारे दृश्य फार सुंदर आहे. आजूबाजूचे डोंगर, हिरवाई, चहाचे मळे, नद्या, शांतता हे सर्व बघून मनाला पण खूप शांती मिळते.
श्री भक्त हनुमान मंदिर, रामबोध येथून दिसणारे सुंदर दृश्य 
📷स्नेहा टिळक 
श्री भक्त हनुमान मंदिर, रामबोध- मंदिर परिसर 
📷स्नेहा टिळक 
जवळ रामबोदा नावाचे धबधबे आहेत. हे नाव मुळात रामबोधाच असावे. श्रीलंकेत विशेषतः नुवारा एलीया च्या परिसरात अनेक धबधबे आहेत. घनदाट जंगलात असलेला हा धबधबा साधारण ३५० फुटांवरून खाली कोसळतो आहे.
 रामबोध धबधबा 
📷स्नेहा टिळक 
ह्या धबधब्यापासून आणि मंदिरापासून अगदी थोड्या किलोमीटर अंतरावर नुवारा एलीया शहर आहे.
नुवारा एलीया शहरात अनेक सुंदर सुंदर हॉटेल्स आहेत. मला नाव आठवत नाही आता, पण आम्ही उतरलो होतो ते हॉटेल म्हणजे मोठा, छानसा, दोन मजली बंगला होता. तिथेच जेवण, ब्रेकफास्ट अशी सोय होती.
हॉटेलकडे जाणारा रस्ता खूप अवघड होता. ड्रायव्हरला त्या भागाची माहिती होती म्हणूनच तो गाडी नेऊ शकला. अत्यंत अरुंद, बाजूला दरी असा तो रस्ता होता.
आमच्या हॉटेलचे प्रवेशद्वार होते, त्याच्या बाजूला बाग होती. त्या बागेला वळसा घालून आपण मागच्या बाजूला गेलो तर आपोआप हॉटेलच्या दुसऱ्या मजल्याच्या दारासमोर पोचायचो इतकी त्या रस्त्याला चढण होती!
हॉटेलमधून दिसणारे दृश्य 
📷स्नेहा टिळक 
हॉटेलमधून दिसणारे दृश्य 
📷स्नेहा टिळक 
पोस्ट ऑफिस 
📷स्नेहा टिळक 
ही विटांची सुंदर इमारत म्हणजे १९ व्या शतकात बांधले गेलेले पोस्ट ऑफिस आहे. ह्या इमारतीच्या सौंदर्यामुळे आणि ती जुन्या काळातील असल्याने आंतरराष्ट्रीय तिकीट दिनाच्या वेळी ह्या इमारतीचा फोटो असलेले पोस्टाचे तिकीट काढण्यात आले होते.
सभोवतालचे चहाचे मळे, बागा, प्रसन्न सुखद हवा ह्यामुळे नुवारा एलीया हे ब्रिटिश अधिकाऱ्यांचे आवडीचे सुट्टीत जाण्याचे ठिकाण होते. ह्याला 'मिनी इंग्लंड' असेही म्हटले जायचे.
आम्हाला मॅकवूडस लाबुकली नावाचा चहाचा कारखाना बघता आला. १८४१ मध्ये सुरु झालेला हा कारखाना खूप प्रसिद्ध आणि ह्या भागातील सर्वात मोठा कारखाना आहे.
चहा तोडणीपासून ते चहा तयार होण्याची प्रक्रिया आपण इथे बघू शकतो. शिवाय त्यांच्या रेस्टॉरंट मध्ये चहा आणि केक खाण्याचा आनंद पण अनुभवू शकतो... अर्थात पैसे देऊन!!
असे म्हणतात की ह्या कारखान्यातून लंडनच्या शाही कुटुंबाला चहा पाठवला जातो. खरे खोटे शाही कुटुंबाला माहिती!!
मॅकवूडस लाबूकली चहा कारखाना 
📷स्नेहा टिळक 
कारखान्याच्या अवतीभोवती सगळीकडे चहाचे मळे, लहान लहान टेकड्या आणि डोंगर आहेत. फार सुंदर दृश्य आहे. जवळच एक झरा किंवा खरे तर लहानशी नदीच वाहते आहे.
चहाचे मळे 
📷स्नेहा टिळक 
हे नुवारा एलीया जवळचे गायत्री मंदिर आहे. मंदिरातील मुख्य देवता गायत्री असली तरी तिथे १०८ शिवलिंगे देखील आहेत. रावणाचा मुलगा मेघनाद इथे शंकराची आराधना करायचा अशी आख्यायिका आहे.
गायत्री मंदिर 
📷स्नेहा टिळक 
ह्याच मंदिराच्या जवळ आम्ही खरे पारिजाताचे फुल पाहू शकलो. सुदैवाने तेव्हा फुलांचा ऋतू देखील होता. ते भलेमोठे झाड, वृक्षच अंगा खांद्यावर मोठाली पारिजाताची फुले वागवीत होता. तिथले पुजारी महोदय म्हणाले हे एकेक फुल झाडावर महिना महिना टिकते.
पण मनात हा खरंच पारिजात आहे का, अशी उत्सुकता होती. म्हणून शोध घेतला तर भारत सरकारच्या पोस्टाच्या तिकिटावर असेच पारिजाताचे चित्र आहे.
पारिजात
📷स्नेहा टिळक 
नुवारा एलीया हे श्रीलंकेतील अत्यंत सुंदर ठिकाणांपैकी एक आहे हे सतत जाणवत राहते. हिरवळीत गुरफटलेल्या टेकड्या, सुंदर शांत जलाशय, खळाळते झरे, उंचावरून कोसळताना तुषारांचा वर्षाव करणारे धबधबे, सगळेच फार सुंदर आहे. शांतवणारे आहे. शहराच्या मध्यभागी गजबज, वर्दळ आहे, पण ती देखील गुदमरवणारी नाही. अर्थात हे सगळे वर्णन २०१३ मधले आहे. संपूर्ण जगभरातच शहरीकरण वेगाने होते आहे. कदाचित नुवारा एलीया चे पण झाले असेल.
नुवारा एलिया 
ह्याच भागात रामायणाशी संबंधित अशी अनेक ठिकाणे आहेत. रामायणातील अनेक प्रसंगाची आठवण सतत होत राहते.
तिथे सीता एलीया मध्ये सीता अम्मन मंदिर आहे. इथेच सीतेला बंदिवासात ठेवलेले होते. इथे पहिल्यांदा हनुमानाला सीतामाई दिसली.
सीता अम्मन मंदिर 
📷स्नेहा टिळक 
सीता अम्मन मंदिर 
📷स्नेहा टिळक 
सीता अम्मन मंदिर 
📷स्नेहा टिळक 
सीता अम्मन मंदिर 
📷स्नेहा टिळक 
सीता अम्मन मंदिर 
📷स्नेहा टिळक 
श्री हनुमान पदचिन्हे, सीता अम्मन मंदिर 
📷स्नेहा टिळक 
मंदिराच्या मागील झऱ्यात हनुमानाची पदचिन्हे देखील दाखवली जातात. 
जिथे सीतेला बंदिवान करून ठेवलेले होते त्या परिसराला अशोक वन किंवा अशोक वाटिका म्हटले जात असे. आता ह्या परिसरात हकगल बोटॅनिकल गार्डन्स आहेत.
हाकागल बोटॅनिकल गार्डन 
कोणी म्हणतात की सिगिरियाला रावणाचा महाल होता. त्याविषयी आपण मागेच एका पोस्टमध्ये वाचले आहे. असे दिसतेय की रावणाचे अनेक ठिकाणी महाल होते.
त्यातील बरेचसे महाल हे गुहांच्या आणि भुयारी मार्गांच्या जाळ्याने जोडलेले होते. त्यामुळे रावणाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने जात येत असे. 
आम्हाला रावणाचे असेच एक निवासस्थान पाहायला मिळाले.
रावण एला गुंफा 
📷स्नेहा टिळक 
रावण एला गुंफा 
📷स्नेहा टिळक 
रावण एला गुंफामधून दिसणारे दृश्य 
📷स्नेहा टिळक 
रावण एला गुंफाकडे जाणारा रस्ता 
📷स्नेहा टिळक 
रावण एला गुहांकडे जाणारा रस्ता अगदी डोंगरातला, जंगलातला, चढणीचा असा आहे. कदाचित ज्येष्ठ नागरिकांना चढायला अवघड वाटू शकेल.
रावण एला गुहेच्या जवळच रावण धबधबादेखील आहे. त्या परिसरात अनेक धबधबे आहेत आणि त्यातल्या अनेकांना एकापेक्षा जास्त नावेदेखील आहेत!!
रावण धबधबा 
📷स्नेहा टिळक 
रामायणाशी संबंधित असे अजून एक महत्वाचे ठिकाण आम्हाला बघायला मिळाले ते म्हणजे सीतेने जिथे अग्निदिव्य केले ती जागा.
अग्निपरीक्षा 
📷स्नेहा टिळक 
हे झाड बोधीगयेतील मूळ बोधीवृक्षाची फांदी आहे असे म्हटले जाते. तिथेच एक बुद्ध मंदिर आहे. मागे एक प्राथमिक शाळा आहे. आम्ही गेलो तेव्हा बहुतेक मधली सुट्टी होती. त्या मुलांचा चिवचिवाट चालू होता!
श्रीलंका निसर्ग सौंदर्याने समृद्ध असा देश आहे. हवा उष्ण आणि दमट आहे. लोक बोलके आणि मदत करणारे आहेत.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली आहे. पण आपल्याला इतका वेळ नसतो. त्यामुळे खाजगी वाहन करणे सोयीचे ठरते.
आम्ही कोलंबो ते कोलंबो असे एक वाहन भाड्याने घेतले होते. संपूर्ण श्रीलंका प्रवासात ती गाडी आमच्यासोबत राहिली. स्थानिक भाषा व सामाजिक व्यवस्था जाणणारा वाहनचालक सोबत असणे चांगले असते.
शुद्ध शाकाहारी किंवा व्हीगन अन्नासाठी आम्हाला तेव्हा शोधाशोध करायला लागली होती. अर्थात ही २०१३ मधील गोष्ट आहे. आता स्थिती सुधारली असेल अशी आशा आहे.


#ramayan #Srilanka #footstepsoframayana #ravanresidence #nuwaraeliya #travelinsrilanka #tipsfortravelinsrilanka #whattoseeinsrilanka #visitsrilanka #ellasrilanka #seetainsrilanka


Comments

  1. आपण पाहतो तो पारिजात काय आहे

    ReplyDelete
  2. छान माहिती मिळाली. धन्यवाद

    ReplyDelete
  3. छान माहिती मिळाली. धन्यवाद

    ReplyDelete
  4. फार उपयुक्त माहीती.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...