Skip to main content

ग्यानबोक पॅलेस, सेऊल, साऊथ कोरिया

राष्ट्रीय अस्मितेची चिन्हे परकीय आक्रमक पुसून टाकायचा प्रयत्न करतात, करतातच. जगभर अशी असंख्य उदाहरणे सापडतील. कारण त्याशिवाय त्यांना त्यांची सत्ता निर्माण करता येणार नसते. पण मग त्या त्या देशातील, देशावर प्रेम असणारे लोक काय करतात हे जाणून घ्यायचे असेल तर एक उदाहरण सांगते. आपल्याला सेऊल मधील ग्यानबोक पॅलेस याच्याविषयी वाचायला हवे.

-------------

तसा पोचायला आम्हाला थोडा उशीरच झाला होता. शेवटची इंग्लिश गाईडेड टूर चुकते की काय अशी भीती वाटायला लागली होती. अनेक कोरियन युवक युवती राजवाड्याकडे जाताना दिसत होते. विशेष म्हणजे त्यांनी पारंपरिक कोरियन पोशाख घातले होते. फार छान दिसत होते ते सगळे. आम्ही गेलो होतो, कोरियाच्या सार्वभौमत्वाचे मानचिन्ह असलेल्या ग्यानबोक पॅलेसला ( Gyeongbok Palace ) भेट देण्यासाठी. 

तिकिटाच्या काउंटर जवळच राजवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याचे नाव आहे ग्वान्गमन गेट.(Gwanghwamun). सेऊलच्या पुरातन इतिहासाचे प्रतीक असलेले हे प्रवेशद्वार १३९५ मध्ये बांधले गेले आहे. आज हे प्रवेशद्वार कोरियाची ओळख बनलेले आहे. कोरियाच्या वास्तुशास्त्राप्रमाणे, कोरियाची भरभराट व्हावी म्हणून, राजाने राजवाड्यात कोणत्या दिशेने आत शिरायला हवे? आत शिरताच त्याच्या नजरेला काय काय दिसायला पाहिजे, कोणत्या दिशेला दिसायला पाहिजे? हे लक्षात घेऊन हे प्रवेशद्वार बांधले गेले होते. 

मुख्य प्रवेशद्वारातून आज जाताच नजरेला त्या राजवाड्याची भव्यता दिसते, विस्तार दिसतो आणि त्या मागे असलेल्या पर्वतरांगाही दिसतात. 


ग्यानबोक पॅलेस
ग्यानबोक पॅलेस
हानबोक - पारंपारिक पोशाख   
हानबोक - पारंपारिक पोशाख   
प्रवेशद्वारातून आत जाताच उजवीकडे इंग्लिश टूरची गाईड हातात झेंडा घेऊन उभी होती. तिने माहिती सांगायला सुरुवात केली. साऊथ कोरियाची राजधानी सेऊल आणि आसपासच्या परिसरात पाच भव्य राजवाडे बांधले गेले. त्यातील हा सर्वात मोठा आणि सर्वात सुंदर राजवाडा. या राजवाड्याचा परिसर 46 लाख स्क्वेअर फूट क्षेत्रफळाच्या जमिनीवर उभा राहिलेला आहे! चोसान डायनेस्टी ( Joseon Dynasty) स्थापन होताच लगेचच बांधला गेलेला हा राजवाडा कोरियाच्या इतिहासाचे अभिमानचिन्ह आहे. कोरियन सार्वभौमतेचे, कोरियन अस्मितेचे चिन्ह असलेला असा हा राजवाडा.
राजवाड्यातल्या पहिले द्वार पार करताच आपल्याला एक पूल दिसतो. एकुणातच ह्या राजवाड्यातील पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे! सध्या पुलाखाली फारसे पाणी नाही पण बाजूला झाडे मात्र फार छान लावलेली आहेत. ती झाडे आहेत चेरी ब्लॉसमची. गाईडने सांगितले हा साकुरा ( जपानी चेरी ब्लॉसम) नाही, कोरियन चेरी ब्लॉसम आहे. त्याला कोरियन भाषेत बॉक्कोत ( Beot -kkot )म्हटले जाते. ती झाडे अजून लहान असल्याने अजून बहरली नव्हती. मला थोडे नवलच वाटले की सेउल मधले सर्वात मोठे पर्यटन स्थळ असलेला हा राजवाडा आणि इथे का बरे ही नवी झाडे असतील? जुन्या झाडांना/ झाडांचे काय झाले असेल? कदाचित फार जुनी झाल्याने वाळवी लागली असेल. मनात असा विचार करत करत मी पुढे निघाले. 
राजवाड्यात अनेक इमारती आहेत. काही अगदी पुरातन तर काही तुलनेने खूपच चांगल्या स्थितीत असलेल्या अशा ह्या इमारती कोरियन वास्तु रचनेला अनुसरून बांधलेल्या आहेत.

ग्यानबोक पॅलेस

एक मुख्य दरबार हॉल आहे जिथे राजा त्याच्या सरदारांना भेटून देशाच्या कारभाराविषयी चर्चा करत असे. तसेच काही राष्ट्रीय महत्वाची घोषणा असेल तर ती देखील याच हॉलमधून व्हायची. याच हॉलमध्ये आपल्याला राजाचे सिंहासन देखील बघायला मिळते. 

सिंहासन 


नक्षीदार छत 

दुसऱ्या एका इमारतीत आपल्याला आधीच्या दरबार हॉलच्या तुलनेने थोडा साधा हॉल बघायला मिळतो. इथे राजा त्याच्या खास सरदारांना भेटत असे. हा सगळा परिसर अतिशय भव्य आहे आणि एक विशेष गोष्ट म्हणजे काही विशेष प्रसंगी या मैदानावर जेव्हा सरदारांना उभे राहायचे असेल तेव्हा त्यांना आपली उभे राहण्याची जागा कळावी म्हणून आपल्याकडे पूर्वी मैलाचे दगड असत तसे दगड, त्या त्या पदाचे नाव असणारे असे, उभारलेले आहेत. अशा रँक स्टोन्सच्या दोन लांब रांगा आपल्याला पाहायला मिळतात. इथे माणसाच्या नावाऐवजी त्या त्या पदाचे नाव घातलेले आहे. माणूस महत्वाचा नाही, त्याच्यावर असणारी जबाबदारी महत्वाची. माणसे येतील जातील, राज्यकारभार चालूच राहील असाच जणू संदेश देणारी ही रचना आहे.

रँक स्टोन्स 
मुख्य भागात असलेल्या इमारती ह्या खासे मंडळींच्या निवासस्थानांच्या आहेत. राजाची राहायची जागा, मुख्य राणीची राहायची जागा वेगवेगळी, राजपुत्राची वेगळी आणि राजमातेची वेगळी. ह्या चारी स्वतंत्र स्वयंपूर्ण इमारती तुलनेने एकमेकांच्या जवळ जवळ आहेत.

ग्यानबोक पॅलेस
ग्यानबोक पॅलेस


ह्या इमारतींमध्ये, प्रत्येक इमारत म्हणजेच एक राजवाडा वाटेल इतक्या खोल्या आहेत. ह्या सगळ्या राहण्याच्या जागांचे जोते उंच केलेले आहे व त्या खालून वाफेद्वारे जमीन तापवण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे सेऊल मधील कडाक्याच्या थंडीतही ह्या खोल्या उबदार राहतील.

 धूर बाहेर जावा म्हणून जी चिमणी केलेली आहे तिच्या भिंतीवर कोरियन मान्यतेनुसार शुभ चिन्हे कोरलेली आहेत. अक्षय तारुण्य दर्शवणारे पाईन वृक्ष, हरीण, कासव आणि औषधी वनस्पती आहेत. दीर्घायुष्य दर्शवणारा सारस पक्षी आहे. संपत्तीचे प्रतीक असणारे वटवाघूळ आहे, दुष्ट शक्तीपासून वाचविणाऱ्या देवी देवता आहात.


शुभचिन्हे 


याखेरीज बाकी राण्या किंवा जो राज्यावर बसणार आहे त्या राजपुत्राखेरीज बाकी सगळे राजपुत्र यांच्या राहण्याच्या जागा थोड्या बाहेरच्या बाजूला आणि एका इमारतीत अनेक जणांची राहायची सोय असावी तश्या आहेत.

ह्या सर्व इमारतींपासून थोडे दूर राजाच्या राज्यकारभाराच्या जागा, खास लोकांना भेटायची जागा अशा सगळ्या इमारती आहेत. राजघराण्याची वाचनालयाची देखील एक सुंदर इमारत आहे. 

राजवाड्याच्या परिसरात अनेक सुंदर व वैशिष्ट्यपूर्ण उद्याने आहेत. काही तळी आहेत. एका मानव निर्मित तळ्यात Gyeonghoeru नावाची इमारत आहे. प्रचंड मोठ्या दगडी खांबांवर अत्यंत सुंदर लाकडी इमारत. शोभिवंत फुलझाडे, तळ्यातील नितळ पाणी, मागे दिसणारा पर्वत ह्या साऱ्यामुळे सर्वच परिसर अतिशय नयनरम्य आहे. ह्या इमारतीत शाही मेजवान्या होत असत. 

Gyeonghoeru
Gyeonghoeru

Gyeonghoeru

एखाद्या वास्तूने किती धक्के सहन करावेत? किती उतार चढाव पाहावेत? किती जखमा सोसाव्यात? मूळात मुख्य राजवाडा चोसान डायनेस्टी चा म्हणून १३९५ मध्ये बांधला गेला, त्यावेळी वैभवाने मिरवत राहिला. पंधराव्या शतकात एकदा आगीमुळे तर उरलेला १५९५ मधील जपानच्या आक्रमणांमुळे उध्वस्त झाला. नंतर मग दोन शतके राजवाडा नांदता झाला नाही. पण मग एकोणिसाव्या शतकात मात्र तो परत एकदा राजवाडा म्हणून उर्जितावस्थेत आला. थोड्या थोडक्या नाही तर जवळपास आठ हजार खोल्या आणि पाचशे इमारती पुनरुज्जीवित करण्यात आल्या. राजवाड्याचे वाईट दिवस संपले असे सगळ्यांना वाटले असेल पण ते समाधान क्षणभंगुर होते.

जपानी, चिनी आणि रशियन लोकांनी सतत कोरियाच्या राज्यकारभारावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला. ह्याच वर्चस्वाच्या चढाओढीत Empress Myung-Sung जिला Queen Min असे देखील म्हंटले जाते, तिचा 1895 मध्ये याच राजवाड्यात खूनही झाला. जपानी सैनिकांनी पद्धतशीरपणे योजना आखून हे घडवून आणले होते असे म्हणतात.

जपानने जेव्हा कोरियावर कब्जा केला तेव्हा कोरियन लोकांचा मानबिंदू असलेला हा राजवाडा, वेगवेगळ्या प्रदर्शनांची जागा आणि शासकीय इमारतींचे स्थान म्हणून वापरला गेला. एवढेच नव्हे तर आमच्या बरोबरचा एक जण म्हणाला की तिथे जपानी लोकांनी एका कोपऱ्यात झु देखील केले होते. जी जागा सामान्य लोकांना पाहायला देखील मिळणे कठीण, अशी जागा सर्रास अनेकांच्या पायाखाली तुडवली जाईल अशी व्यवस्था जपान सरकारने केली. 

राजवाड्यातील आधीच्या बागा काढून टाकून तिथे जपानी वनस्पती लावल्या गेल्या, ज्यायोगे शासनकर्त्या जपानी अधिकाऱ्यांना त्यांच्या सवयीचे दृश्य दिसू शकेल. त्याच वेळी कोरियन चेरी ब्लॉसम काढून टाकून जपानी चेरी ब्लॉसम लावला गेला होता. 

राजवाड्याची ओळख असलेले, कोरियाची भरभराट व्हावी म्हणून, कोरियन वास्तुशास्त्राप्रमाणे बांधले गेलेले राजवाड्याचे प्रचंड मोठे मुख्य प्रवेश द्वार देखील त्याच्या मूळ जागेवर हलवून दुसरीकडे नेले गेले. 

सर्वसाधारणपणे सगळे आक्रमक राज्यकर्ते, दुसऱ्यांच्या देशात आपले शासन स्थापित करण्यासाठी जे करतात तेच जपानी लोकांनी अधिक आक्रमकतेने केले. कोरियन लोकांची अस्मिता नष्ट व्हावी, त्यांची स्वतःची कोरियन म्हणून असलेली ओळखच ते विसरून जावेत याचा पूर्ण प्रयत्न जपानी शासकांनी केला. 
जे जे कोरियन संस्कृतीनुसार केलेलं होतं ते ते सगळं बदलून टाकलं अगदी प्रवेशद्वारासकट. प्रत्येक वेळी ह्या राजवाड्याची आठवण आली, राजवाडा दिसला की प्रत्येक कोरियन माणसाला आता आपण जपानच्या अधिपत्याखाली आहोत ह्याची जाणीव व्हायलाच हवी, अशी सर्व मोड तोड, बदल केले. 

त्याचाच एक भाग म्हणून कोरियाची राजभाषा जपानी केली गेली. कोरियन लोकांना त्यांची कोरियन आडनावे सोडून जापनीज आडनावे घेण्याची सक्ती केली गेली. शाळांमधून जुनी कोरियन लिपी आणि कोरियन इतिहास शिकवायला बंदी केली गेली.

कोरियन चेरी ब्लॉसम गेला, जापनीज आला. कोरियन भाषा गेली आणि जपानी आली. राजवाड्यातील कोरियन इमारती गेल्या आणि तिथे जपानी शासकांच्या कार्यालयांच्या, प्रदर्शनांच्या, त्यांच्या निवास स्थानांच्या इमारती आल्या. राजवाड्याच्या जमीनीची मालकी देखील जपानी गव्हर्नर जनरल कडे देण्यात आली. 


जपानने केले त्यात विशेष वेगळे काही नाही. सगळे आक्रमक असेच करतात. पण आता कोरिया आपली संस्कृती पुनरुज्जीवित करण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत, करते आहे ते मात्र विशेष उल्लेखनीय आहेत.

मी सुरुवातीला लिहिले होते की पारंपरिक कोरियन पोशाख ( Hanbok ) घातलेले अनेक तरुण-तरुणी राजवाड्याकडे जाताना दिसत होते. त्याचे कारण म्हणजे कोरियाच्या सरकारने असे जाहीर केलेले आहे की जर का तुम्ही पारंपरिक कोरियन पोशाखात असाल तर तुम्हाला राष्ट्रीय स्मारकात येताना प्रवेश फी भरावी लागणार नाही! या आमिषामुळे म्हणा किंवा उत्तेजनामुळे म्हणा, अनेक कोरियन तरुण-तरुणी, जे एरवी अत्याधुनिक पोषाखात असतात ते, अशा ठिकाणी येताना पारंपारिक पोशाखात येत असतात. त्यांची फोटोसेशन तिथे चालू असतात. आपण अगदी इतिहासकाळात आहोत असेच ते पोशाख बघून वाटत असते. 


जपानी सरकारने राजवाड्याचे मुख्य प्रवेश द्वार मूळ जागेपासून हलवले होते ते आता परत मुळ जागी आणले गेले आहे. राजवाडा मूळ रूपात परत आणण्याचा एकूण चाळीस वर्षे चालणारा असा हा भव्य प्रकल्प हातात घेतला गेलेला आहे. 

जपानी राजवटीची आठवण करून देणारी इथली जपानी प्रशासकीय इमारत पाडली गेली. इमारत काही लहान-सहान नव्हती. जवळपास आपल्या संसदेइतकी मोठी आणि देखणी इमारत होती ती. पण ती पाडली गेली. ह्या आवारातील इतर सर्व जपानी इमारती देखील पाडल्या गेल्या. जुने नकाशे तसेच उपलब्ध असलेली छायाचित्रे बघून कोरियन वास्तू शास्त्राप्रमाणे, पूर्वी होत्या तशाच इमारती पुन्हा बांधण्याचे काम सध्या चालू आहे. 

ह्या राजवाड्यातील जपानी चेरी ब्लॉसम काढून टाकून तिथे कोरियन चेरी ब्लॉसम लावला गेला आहे. कोरियन लिपी पुनरुज्जीवित केली गेली आहे. 

आम्ही २०१९ मध्ये गेलो तेव्हाही राजवाड्यात थोडे काम चालूच होते. पण ते सर्व काम पूर्ण झाले आहे असे दोन तीन वर्षांपूर्वी बातम्यात वाचल्याचे आठवते.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी लक्षावधी कोरियन लोकांना पुरुषांना जपानी सैन्यात भरती केले गेले आणि लढायची सक्ती केली गेली. अक्षरशः दोन पिढ्या यात संपूर्ण गारद झाल्या. कोरियन महिलांवर तर मरण बरे असा प्रसंग ओढवला. कारण त्यांना जपानी सैनिकांच्या कम्फर्ट वूमन म्हणून सेक्स वर्करचे काम करावे लागले. त्यांच्या घरातून, गावातून पळवून नेलेल्या या स्त्रिया इतक्या अनन्वित अत्याचारांना बळी पडल्या की युद्धानंतर ना त्या घरी परतल्या, ना त्यांच्या कुटुंबाने समाजापुढे त्यांची ओळख उघड केली. अनेक वर्षे, आपली काहीही चूक नसताना त्यांनी अज्ञातवासात, विपन्नावस्थेत, रोगांशी झुंज देत काढली. अगदी अलीकडे 2015 साली जपानने आपली चूक कबूल करून, कोरियन कम्फर्ट वुमन्स च्या कल्याणासाठी एक बिलियन येन देऊ केले व त्यांची जाहीर माफी मागितली. 


साऊथ कोरिया आपली छिन्नविछिन्न झालेली संस्कृती आणि देशाची मानचिन्हे आता पुनर्स्थापित करत आहे. साऊथ कोरियाची गेली सत्तर वर्ष शांततेची नव्हतीच. अनेकदा राजवट बदलली. राजवट बदलली गेली पण कोणतीही राजवट आली तरी आपली संस्कृती पुनर्स्थापित करण्याचे प्रकल्प स्थगित किंवा रद्दबातल केले गेले नाहीत हे विशेष आहे. 

या एकजुटीमुळे, देशाचे भले कशात आहे याविषयीची निखळ दृष्टी असल्याने, सर्व आव्हानांवर मात करत आज कोरिया जगात एक बलाढ्य शक्ती म्हणून मानला जात आहे. 

अनेक वर्षांच्या परकीय राजवटीनंतर, दुसऱ्या महायुद्धातील आघातानंतर, शिवाय एकोणीसशे पन्नास-पंचावन्नमधला दोन कोरियातील लढा व त्यानंतर झालेले अनेक उठाव, राजवटीतील बदल, संघर्ष, निदर्शने, हरताळ, त्रस्त करणारा भ्रष्टाचार या सगळ्याला तोंड देऊन आज साऊथ कोरिया जगातील एक आघाडीचे प्रगत राष्ट्र म्हणून उदयास आलेला आहे. 

 तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तर कोरिया अव्वल स्थानावर आहे. कोरियन सौंदर्यप्रसाधने आणि वस्त्रे आज जगभरातील चोखंदळ रसिकांना हवीहवीशी वाटत आहेत. कोरियन संगीत, टीव्ही सिरीयल्स आणि चित्रपट जगभरात गाजत आहेत. क्‍लिष्ट मानवी स्वभावाची व वागणुकीची कोरियन दृष्टीने मीमांसा करणारा पॅरासाईट नावाचा चित्रपट इतिहास घडवून गेला आहे. आत्तापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवातून पारितोषिके मिळवलेल्या ह्या चित्रपटाने २०२०च्या अकॅडमी अवॉर्ड्स सोहळ्यात अनेक नामांकने, अनेक पारितोषिके तर मिळवलीच पण परकीय भाषेतला असूनदेखील उत्तम चित्रपटाचे पारितोषिक मिळवणारा गेल्या 93 वर्षातला तो पहिला चित्रपट ठरला. आत्तापर्यंत इंग्रजी खेरीज इतर कोणत्याही भाषेतल्या चित्रपटाला हे पारितोषिक मिळालेले नव्हते.

 कोरियाची सर्वच क्षेत्रातील नेत्रदीपक प्रगती ही कोरियाने आपली संस्कृती पुनर्स्थापित करण्याच्या प्रयत्नाला मिळालेली दाद आहे, एक शुभचिन्ह आहे. मूळांकडे परत जाताना आकाशाला घातलेली गवसणी आहे. आपली पुरातन संस्कृती, आपली मानचिन्हे ह्यांचा बळी न देताही प्रगती साधता येतेच ह्याची खूणगाठ आहे. 


ग्यानबोक पॅलेस
ग्यानबोक पॅलेस

(हा लेख संक्षिप्त स्वरुपात चैत्रेय २०२० मध्ये प्रकाशित झाला होता. )

#Seoul #Gyeongbokgung #South Korea #Japanese Invasion 

Comments

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...