Skip to main content

कारगिल युद्ध स्मारक - ऑपरेशन विजय स्मृतिस्थल

 तीर्थक्षेत्रे- आपापल्या आराध्य देवतांच्या, कुलदैवतांच्या मंदिरात सगळे जातात. आदर्श अशा राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांना देखील भेटी दिल्या जातात. ह्या शिवाय प्रत्येक भारतीयाने भेट दिलीच पाहिजे अशी तीर्थक्षेत्रे म्हणजे युद्ध स्मारके. स्वतंत्र भारताने लढलेल्या युद्धांची स्मारके. देशाच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या सैनिकांना मानवंदना देण्यासाठी उभारलेली गेलेली स्मारके. 

का भेट द्यायची? - समूहाची स्मरणशक्ती अल्पजीवी असते ह्याचा प्रत्यय अनेकदा येतो. १५ ऑगस्ट, २६ जानेवारीच्या दिवशी सकाळी उफाळून येणारे राष्ट्रप्रेम दुपारनंतर पुसट होत होत नाहीसे होते. युद्धकथा असलेला एखादा चित्रपट आला की त्या आठवणी ताज्या होतात. ते तेवढ्यापुरतेच. प्रसार माध्यमे स्वतःच्या चष्म्यातून एखाद्या घटनेकडे पाहायला लावतात आणि प्रेक्षकांची विचारशक्ती झाकोळली जाते. 

ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर युद्धस्मारके पाहताना त्या घटनेची सत्य माहिती मिळते. आपले मत स्वतःच्या विचारानुसार तयार होते. आपल्या सैनिकांनी केलेला त्याग पाहून त्यांच्याविषयीच्या आदराने आणि कृतज्ञतेने मन भरून येते. सैनिकांइतके मला जमले नाही तरी माझ्या राष्ट्राच्या सेवेसाठी, रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी मला जमेल त्या पद्धतीने आणि जमेल ते सगळे मी करेन असा निश्चय मनात जागतो. 

त्यामुळे युद्ध स्मारके पाहायला खरे तर शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तर घेऊन जायला हवेच पण प्रत्येक भारतीय नागरिकाने देखील ती पाहिली पाहिजेत. 

फक्त एक भान ही स्मारके बघताना, तिथे फोटो काढताना निश्चित बाळगले पाहिजे ते म्हणजे ही पर्यटन स्थळे नव्हेत. राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणारी, स्फूर्ती जागवणारी तीर्थक्षेत्रे आहेत. त्याच गांभीर्याने तिथे वावरले पाहिजे. 

कोणती पाहिली?- प्रत्यक्ष युद्ध जिथे झाले त्या स्थानाच्या जवळ उभारलेल्या युद्ध स्मारकांविषयी बोलायचे तर ह्या आधी आपण ब्लॉगपोस्ट मध्ये तवांग युद्ध स्मारकाविषयी तर वाचलेच आहे. शिवाय जैसलमेर जवळचे लोंगेवाला युद्ध स्मारक देखील मला पाहता आले आहे. आज लिहिते आहे ते नुकत्याच गेल्या महिन्यात पाहिलेल्या कारगिल युद्ध स्मारकाविषयी. 

कारगिल युद्ध स्मारक - ऑपरेशन विजय स्मृतिस्थल 

कारगिल युद्ध स्मारकाने सर्व राष्ट्रप्रेमी भारतीयांच्या मनात विशेष स्थान पटकावले आहे. 




कुठे आहे?- काश्मीर लडाख सीमेजवळ लडाख मधील द्रास जवळ हे स्मारक उभारले गेले आहे. कारगिल गाव ह्या स्मारकापासून साधारण ६०/७० किलोमीटरवर आहे. 

द्रास जवळ तोलोलिंग टेकड्यांच्या पायथ्याशी श्रीनगर लेह रस्त्यानजीक हे स्मारक आहे. अगदी हमरस्त्यालगतच हे स्मारक आहे. म्हणताना जरी टेकड्यांच्या पायथ्याशी म्हटले तरी समुद्र सपाटीपासून साधारण नऊ हजार फूट उंचीवर हे स्थान आहे. 

 आम्ही काश्मीर मधील सोनमर्गहून कारगिल युद्ध स्मारकात गेलो होतो. युद्ध स्मारक पाहणे हेच आमचे उद्दिष्ट्य असल्याने आम्ही पुढे कारगिल गावात गेलो नव्हतो. 

तुम्ही तुमच्या लेहलडाख ट्रीपमध्ये हे स्मारक पाहणार असाल तर लेहहून देखील तुम्हाला येत येईल. त्या वेळी आधी कारगिल गाव लागेल आणि मग स्मारक येईल. 

रस्ता कसा आहे?- काश्मीरच्या बाजूने स्मारकाकडे येणारा हा रस्ता खूपच थरारक अनुभव देणारा आहे. इतक्या अवघड ठिकाणी रस्ता तयार करणाऱ्या सीमा सडक संस्थेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. 

अतिशय उंचावरून जाणारा चिंचोळा रस्ता, शेजारी अगदी खोल दरी आहे. खाली पाहिले की डोळे फिरतील इतकी खोल दरी आहे. 

📷 कौस्तुभ पटवर्धन 

हा पर्वताला गुंडाळलेला बारीक दोरा वाटतो आहे तो रस्ता आहे! रस्ता तसा चिंचोळा असल्याने मोठे ट्रक्स आले की वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे सोनमर्गहून सकाळी अगदी लवकर निघून वाटेत फार वेळ न घालवता थेट कारगिल युद्ध स्मारक गाठावे हे उत्तम. अंतर तसे कमी असले तरी रस्ता अवघड असल्याने साधारण अडीच ते तीन तास लागू शकतात. तुम्ही जर का वाहतूक कोंडीत अडकलात तर मग किती वेळ लागेल ते सांगता येणार नाही. कारण ह्या भागात मोठ्या प्रमाणावर मिलिटरी ट्रक्स ची ये जा चालू असते. 

कधी पाहायचे ?- हिवाळ्यात इथे जाणे तर अशक्यच आहे. ह्या परिसरात तापमान अगदी कमी होते. बर्फामुळे रस्ते बंद होतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या महिन्यातच जावे लागते. साधारण मे ते ऑक्टोबर मध्ये जाणे सोयीचे असेल. 

वाहनतळ?- स्मारकाच्या अगदी समोरच मोठा वाहनतळ

आहे. सरक्षेच्या कारणास्तव तुम्ही युद्धस्मारकात जाताना काहीही सामान सोबत घेऊन जाऊ शकत नाही. ते सर्व गाडीतच ठेवावे लागते. 

खिशात कार्ड, पैसे घेऊन जाऊ शकता. आत एक लहानसे दुकान आहे. तिथे स्मृतिचिन्हे विकत घेण्यासाठी पैसे लागतात.  

काय पहाल?- गाडीतून उतरल्यावर आपला प्रवास आणि इतर वैयक्तिक गोष्टींपासून बाजूला होऊन संपूर्ण लक्ष युद्ध स्मारकाकडे लागण्यासाठी मनोभूमिका तयार करते ते स्मारकासमोरचे हे दृश्य . 



📷 कौस्तुभ पटवर्धन 

नंतर दिसते प्रवेशद्वार. इथे नाव नोंदणी केल्यावर मग आपल्याला आत जाता येते. 

आत गेल्यावर दिसते ते भव्य आवार, समोर सरळ मोठा विजयपथ, दोन्ही बाजूला फडकणारे वीस ध्वज, मरणोत्तर परम वीर चक्र आणि महावीर चक्र पुरस्कारप्राप्त आठ वीरांचे पुतळे, तोफा आणि अगदी समोर बर्फाच्छादित पर्वतरांगांच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले फिक्या गुलाबी दगडातील युद्ध स्मारक. 

📷 कौस्तुभ पटवर्धन 
आपला तिरंगा ध्वज डौलाने फडकतो तो वाऱ्यामुळे नव्हे तर शूर सैनिकांच्या श्वासामुळे, हे एका फलकावर वाचलेले वाक्य इथे प्रत्ययाला येते. 

📷 कौस्तुभ पटवर्धन 

प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या हाताच्या इमारतीत ऑपरेशन विजयची म्हणजेच कारगिल युद्धाची माहिती देणारी एक चित्रफीत विनामूल्य दाखवली जाते. अत्यंत प्रभावी अशी ही चित्रफीत पाहून ज्याचे मन उचंबळून आले नाही असा एकही भारतीय नसेल. ती आधी बघून नंतर स्मारक बघितले तर आपल्याला स्मारक जास्त चांगले कळेल. 


इथे नजरेत भरतो तो अतिशय उंच आणि भव्य असा तिरंगा ध्वज. अमर जवान ज्योत मध्यभागी निरंतर तेवते आहे. त्याच्या बाजूने चार मिनार उभे आहेत. पाठीमागच्या भिंतीवर कारगिल युद्धात शहीद झालेल्या सर्व सैनिकांची नावे सोनेरी अक्षरात कोरलेली आहेत. 

मध्यभागी आहेत माखनलाल चतुर्वेदी ह्यांच्या पुष्प की अभिलाषा ह्या कवितेतील काही काव्यपंक्ती. 

"चाह नहीं मैं सुरबाला के
गहनों में गूंथा जाऊं,
चाह नहीं, प्रेमी-माला में
बिंध प्यारी को ललचाऊं,
चाह नहीं, सम्राटों के शव
पर हे हरि, डाला जाऊं,
चाह नहीं, देवों के सिर पर
चढूं भाग्य पर इठलाऊं।
मुझे तोड लेना वनमाली!
उस पथ पर देना तुम फेंक,
मातृभूमि पर शीश चढाने
जिस पथ जावें वीर अनेक

इथे साधारण प्रत्येक तासातून एकदा, एक जवान कारगिल युद्धाची म्हणजेच ऑपरेशन विजयची समग्र माहिती देतो. इतक्या उंचीवर इतका वेळ सलग बोलणे ते देखील माईक न घेता, खड्या आवाजात हे आपल्यासारख्या सामान्य जनतेसाठी अशक्यप्राय आहे. त्या साठी शारीरिक बळाची तर आहेच, त्या शिवाय मनात धगधगत असलेल्या कर्तव्यभावनेची देखील आवश्यकता आहे. 

स्मरण कुटीर -



मरणोत्तर परमवीरचक्र प्राप्त कॅप्टन मनोज कुमार पांडे ह्यांचे नाव असलेली हे स्मरणकुटीर म्हणजे ऑपरेशन विजयचे एक संग्रहालय आहे. 

वीरांचे फोटो, घटना कशा घडत गेल्या त्याचे वर्णन, काही वस्तू आणि प्रतिकृती ह्या सगळ्यांमुळे आठवणी जागवणारे आणि कायम आठवणीत राहणारे असेच हे संग्रहालय आहे. 

वीरभूमी - अमरज्योतीच्या दुसऱ्या बाजूला आहे वीरभूमी. त्या युद्धात तसेच त्या भागात आत्तापर्यंत विविध चकमकीत, मोहिमांमध्ये शहीद झालेल्या सैनिकांचे स्मरण करणारी वीरभूमी. 

📷 कौस्तुभ पटवर्धन 

📷 कौस्तुभ पटवर्धन 
कारगिल युद्ध कसे सुरु झाले ते तर आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. मे १९९९ च्या पहिल्या आठवड्यात सुरु झालेले हे युद्ध २६ जुलै १९९९ ला भारताच्या विजयाने संपले. त्याविषयी विस्ताराने लिहिण्याची ही जागा नाही. द्रास, काकसार, मश्कोह, तोलोलिंग, टायगर हिल कारगिल, तुर्तुक ह्या ठिकाणच्या लढाया आणि अगदी संक्षिप्त घटनाक्रम एका पोस्टरवर दिलेला आहे. 

हे युद्ध करणारे आपले सैनिक आहेत हे तर पाकिस्तानने तर अनेक दिवस मान्यच केले नव्हते. पण मृत सैनिकांच्या जवळची ओळखपत्रे, शस्त्रे, त्यांचे बंकर्स ह्या सगळ्यांमुळे उशिरा का होईना पण अखेर पाकिस्तानलाही ह्या युद्धातील पाकिस्तानी सैन्याचा सहभाग मान्य करायलाच लागला. त्यातील काही बंकर्स आपल्याला स्मारकाच्या आवारात पाहायला मिळतात. 

कारगिल युद्ध स्मारकाच्या आवारात अनेक लहान लहान इमारती आहेत. त्यात काही संग्रहालये, छायाचित्र प्रदर्शने आहेत. सगळे नीट पाहण्यासाठी साधारण तीन ते चार तास राखून ठेवा. 

📷 कौस्तुभ पटवर्धन 


सर्वात उंचावर लढल्या गेलेल्या अत्यंत अवघड युद्धांपैकी एक म्हणून हे युद्ध जगभरात प्रसिद्ध आहे. ह्या युद्धात दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणावर प्राणहानी झाली. दारुगोळा आणि शस्त्रात्रे प्रचंड प्रमाणात वापरली गेली. 

ह्या युद्धात भारत विजयी झाला पण त्यासाठी अनेक सैनिकांच्या प्राणांची किंमत  मोजावी लागली. अनेक विशी बाविशीतील तरुण सैनिकांनी देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. कॅप्टन सौरभ कालिया, कॅप्टन विक्रम बात्रा, कॅप्टन मनोज पांडे ही नावे आपल्या सगळ्यांच्या स्मरणात कोरलेली आहेतच. पण ह्यांच्याखेरीज आणखी शेकडो सैनिक धारातीर्थी पडले आहेत.  

ह्या युद्धाने भारताच्या संरक्षण धोरणाला एक वेगळे आणि प्रभावी वळण दिले. युद्धे होऊच नयेत असे आपल्याला कितीही वाटत असले तरी जोपर्यंत आपल्या शेजारी देशांनांही किंवा खरेतर जगातील सर्व देशांना जोपर्यंत ते पटत नाही तोपर्यंत अतिशय भक्कम संरक्षण व्यवस्था आपल्याकडे असणे गरजेचे आहे. 

ह्या युद्धस्मारकाच्या रस्त्यावरचे झोजिला पास, झिरो पॉईंट, द्रौपदी कुंड आणि प्रत्यक्ष रस्ता ह्याविषयी लिहायचे म्हटले तर ही पोस्ट खूप मोठी होईल. त्यामुळे त्यावर एक स्वतंत्र पोस्ट लिहीन. ती देखील वाचायला विसरू नका!


तुमच्या काश्मीर पर्यटनात तुमच्याकडे वेळ कमी असेल तर श्रीनगरमधील एखादी बाग नाही पाहिलीत तरी काही बिघडत नाही. पण कारगिल युद्ध स्मारकाचा समावेश मात्र अवश्य करा. एक दिवस ह्यासाठी खास राखून ठेवा. जोपर्यंत तुम्ही कारगिल युद्ध स्मारक पाहत नाही तोपर्यंत तुमची काश्मीर किंवा लेह ट्रिप पूर्ण झाली असे म्हणूच नका. 

"तुम्ही जेव्हा घरी जाल तेव्हा आमच्या विषयी देशवासियांना सांगा आणि सांगा की त्यांचा भविष्यकाल सुरक्षित व्हावा म्हणून आम्ही आमचा वर्तमान समर्पित केला आहे. - भारतीय सैनिक "


#kargil #operationvijay # vijaydiwas #dras # Kashmirtourism # Kargilwarmemorial # warmemorialsinIndia #Indianarmy # Indianmilitary #KargilVijayDiwas 


Comments

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...